शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

पोलिसांसह महापालिकेमुळे सानपाडामध्ये झाली वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:49 IST

सानपाडामध्ये सायन-पनवेल महामार्गाला समांतर असणाऱ्या रोडवर पोलीस व महापालिकेमुळे वाहतूक समस्या वाढली आहे. दत्तमंदिरकडे जाणा-या रोडवर एक बाजूला ‘नो पार्किंग’ व दुस-या बाजूला ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा फलक लावण्यात आला आहे.

नवी मुंबई : सानपाडामध्ये सायन-पनवेल महामार्गाला समांतर असणाऱ्या रोडवर पोलीस व महापालिकेमुळे वाहतूक समस्या वाढली आहे. दत्तमंदिरकडे जाणा-या रोडवर एक बाजूला ‘नो पार्किंग’ व दुसºया बाजूला ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा फलक लावण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या फलकांमुळे वाहतुकीची समस्या वाढली असून, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.शहरामधील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे; परंतु दोन्ही संस्थांच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक ठिकाणी समस्या सुटण्याऐवजी वाढू लागली असून, यामध्ये सानपाडा दत्तमंदिर रोडचाही समावेश आहे. सायन-पनवेल महामार्गाला लागून रेल्वे स्टेशनकडून मंदिराकडे जाणारा समांतर रस्ता बनविला आहे. या परिसरामध्ये पृथ्वी पार्क व बाजूच्या इमारतीमध्ये बँकेसह इतर व्यावसायिक गाळे असून निवासी संकूल आहेत. निवासी संकुलामधील व या परिसरातील वाहन विक्रीचा व्यवसाय करणाºयांची वाहने रोडच्या एका बाजूला उभी केली जात होती. एक बाजूला वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतूककोंडी होत नव्हती.वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सूचना व हरकती न घेता, वास्तव स्थितीचा विचार न करता, ज्या बाजूला वाहने पार्किंग करणे आवश्यक आहे त्या बाजूला नो पार्किंगचे फलक लावले आहेत. ज्या बाजूला वाहने उभी करणे सुरक्षित नाही व वाहतुकीसाठी योग्यही नाही त्या बाजूला पे अ‍ॅण्ड पार्कचे फलक लावले आहेत. वास्तविक पे अ‍ॅण्ड पार्कला या परिसरामध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेली नाही. पे अ‍ॅण्ड पार्क प्रत्यक्षात सुरूही केलेले नसून, ते सुरू करणे वाहतुकीसाठी योग्यही होणार नाही; परंतु या दोन्ही फलकांमुळे वाहनधारक संभ्रमात आहेत. पूर्वी एक बाजूला वाहने उभी केली जात होती. आता दोन्ही बाजूला वाहने उभी राहत असून, त्यामुळे वाहतूककोंडी वाढली आहे.वाहतूक पोलीस व महापालिकेने चुकीच्या पद्धतीने फलक लावले आहेत. यामुळे वाहतूककोंडी वाढली आहे. पे अ‍ॅण्ड पार्कचे बोर्ड काढण्यात यावेत व नो पार्किंगचे फलक काढून त्या ठिकाणी पार्किंगचे फलक लावण्यात यावेत.- अरुण शिंदे, वाहनधारकदत्तमंदिर रोडवर नो पार्किंगचे फलक लावलेल्या बाजूलाच वाहने उभी करणे सुरक्षित आहे. पे अ‍ॅण्ड पार्कच्या बाजूला नो पार्किंगचे बोर्ड लावण्याची गरज आहे. पूर्वीप्रमाणे व्यवस्था न केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.- सचिन पवार, रहिवासी, सानपाडा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई