शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पावसाळ्यात वाहतूककोंडी होणार !

By admin | Updated: May 15, 2016 04:08 IST

ठेकेदाराला कार्यादेश देऊनही भूमिपूजनासाठी झालेल्या दिरंगाईमुळे पनवेलमधील काँक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यामध्ये शहरात चक्का जाम होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई : ठेकेदाराला कार्यादेश देऊनही भूमिपूजनासाठी झालेल्या दिरंगाईमुळे पनवेलमधील काँक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यामध्ये शहरात चक्का जाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता असून, पालिका प्रशासनाने तत्काळ योग्य उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँगे्रसने केली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक शिवदास कांबळे यांनी नगराध्यक्षा चारुशीला घरत व मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना पत्र पाठवून काँक्रीटीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. पनवेल शहरामध्ये प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. रोडवरील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरातील प्रमुख पाच रोडचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएच्या सहकार्याने हे काम केले जाणार असून, त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. खड्ड्यांची समस्या किमान काही वर्षे सुटणार असल्याने शहरवासीयांनीही या निर्णयाचे स्वागतच केले होते. काँक्रीटीकरणासाठी निविदा प्रक्रिया आॅक्टोबर २०१५ मध्येच पार पाडली होती. ठेकेदाराला कार्यादेशही दिले होते, परंतु उद्घाटनासाठी राज्यातील नेत्यांची वेळ मिळत नसल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. ८ जानेवारीला भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील रस्ते खोदून ठेवले आहेत. ३० मेनंतर शहरातील खोदकाम व इतर कामे थांबवावी लागणार आहेत. अर्धवट राहिलेल्या कामांमुळे महत्त्वाच्या रोडवर प्रचंड वाहतूककोंडी होणार आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय व अपघात होण्याचीही शक्यता आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने महापौर व मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन अर्धवट राहिलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शहरवासीयांना प्रत्येक वर्षी रोडवरील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. आता प्रमुख रस्तेच खोदून ठेवले आहेत. प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठोस उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.