शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

विद्यार्थ्यांना सौरऊर्जा वापराचे प्रशिक्षण, आयआयटी बॉम्बेचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:31 IST

गेल्या काही वर्षांत सौरऊर्जेचा वापर काही प्रमाणात वाढला आहे, पण नवीन पिढीला शालेय जीवनापासून सौरऊर्जेविषयी माहिती आणि ऊर्जा वापरण्याचे प्रशिक्षण दिल्यास, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे.

नवी मुंबई : गेल्या काही वर्षांत सौरऊर्जेचा वापर काही प्रमाणात वाढला आहे, पण नवीन पिढीला शालेय जीवनापासून सौरऊर्जेविषयी माहिती आणि ऊर्जा वापरण्याचे प्रशिक्षण दिल्यास, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे. हे लक्षात घेऊन आयआयटी बॉम्बेने ‘सोलर ऊर्जा थ्रू लोकलायझेशन फॉर सस्टेंनॅब्लिटी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत रायगड येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ४०० विद्यार्थ्यांना सौरऊर्जा वापराचे प्रशिक्षण दिले आहे.देशातील ग्रामीण भागात अजूनही लोडशेडिंग आहे. विजेची तूट असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अनेकदा व्यत्यय येतो. त्यामुळे आयआयटी बॉम्बेने सौरऊर्जेवर चालणारे दिवे तयार केले आहेत. ग्रामीण भागात या दिव्यांद्वारे सौरऊर्जेविषयी जनजागृती करून त्याचा वापर वाढावा, म्हणून आयआयटी बॉम्बेने उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी आणि सातवीच्या ४०० विद्यार्थ्यांना सौरऊर्जेविषयी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पारंपरिक वापरात येणारी वीज आणि सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज याविषयी माहिती देण्यात आली, तसेच सौरऊर्जेचे फायदे, उपयोग, तांत्रिक माहिती, सौर उपकरणांचा वापर याविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.सौरदिवे लावून दिल्यावर त्याची देखभालही महत्त्वाची आहे. त्यामुळे या दिव्यांची देखभाल करण्यासाठी सौरऊर्जेची प्रयोगशाळादेखील गावांमध्ये उभी करण्यात येणार असल्याचेही आयआयटीतर्फे स्पष्ट करण्यात आले. या प्रयोगशाळांमध्ये नवीन संशोधन करण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे मत, एनर्जी सायन्स विभागाचे प्रा. चेतन सोलंकी यांनी सांगितले.