शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सहार्बरवरील स्थानके समस्याग्रस्त, प्रवाशांची गैरसोय :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 04:42 IST

ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांना समस्यांचा विळखा पडला आहे. भुयारी मार्गांमध्ये पाणी साचत आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांना समस्यांचा विळखा पडला आहे. भुयारी मार्गांमध्ये पाणी साचत आहे. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून स्टेशन परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा वावरही वाढला असून रेल्वे स्टेशननिहाय वस्तुस्थिती पुढीलप्रमाणेतुर्भे रेल्वे स्टेशनतुर्भे रेल्वे स्थानकात अनेक नागरी समस्या आहेत. स्टेशनच्या आवारात गळती सुरू आहे. रेल्वे फलाटावरील लोखंडी बाकडे तुटलेले आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश करताना काही चालू बंद दिव्यांमुळे अंधारातून जावे लागते. त्यातच भिंतींना गळती लागल्यामुळे सर्व पाणी खाली पडत आहे. छताचे पावसाचे पाणी जाणारे पाइप फुटल्यामुळे सर्व पाणी प्रवाशांच्या डोक्यावर पडत आहे. रेल्वे पादचारी पुलाची सोय नसल्यामुळे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जात असल्याने येथे अनेकदा लहान-मोठे अपघातही झालेले आहेत.कोपरखैरणे रेल्वे स्टेशनकोपरखैरणे या रेल्वे स्थानकात फलाट क्र . एक आणि दोनवर विजेच्या उघड्या डीपी बॉक्सची समस्या फार गंभीर आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचा घोळका नेहमीच बसलेला असतो. मात्र पुरेशा पोलीस बळाअभावी अशा अपप्रवृत्तींना अटकाव केला जात नाही. येथील भिंतीतून पाणी येत असल्यामुळे गळती कायम आहे. भिकारी, फेरीवाले आणि भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. तिकीट खिडकीजवळ एक तिकीट वेंडिंग मशिन बंद आहे. त्यामुळे तिकिटासाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागतात. भरदिवसा भिकारी झोपा काढत असल्यामुळे हे स्टेशन या लोकांना आंदण दिल्याप्रमाणे आश्रमगृहासारखे राहतात. रेल्वेच्या आवारात ठिकठिकाणी बांधकाम साहित्य पडलेले आहे. पाणपोईची सुविधा आहे, पण तेथील नळच गायब असल्यामुळे प्रवाशांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.घणसोली रेल्वे स्टेशनघणसोली रेल्वे स्थानकाच्या पादचारी भुयारी मार्गाची अवस्था फार दळभद्री झाली आहे. या पुलात प्रवेश करताना ठाणे-बेलापूर महामार्गातील दिशेला पाण्याची गळती, केरकचºयाचे ढिगारे, दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. भिंतीतून पाणी गळती होत आहे. रात्री गर्दुल्ले आणि काही तृतीयपंथीय लोक असतात. डीपी बॉक्समधील विजेची बटणे आणि वायरिंग जळून काळी पडलेली आहेत. वाहने पार्किंगची समस्या गंभीर असून रिक्षाचालकांनी अतिक्र मण केले आहे.रबाळे रेल्वे स्टेशनरबाळे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. २ मध्ये पाणपोई असून पिण्याचे पाणीही उपलब्ध आहे, मात्र पाण्याचा निचरा व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली असल्याने डेंग्यू, मलेरिया किंवा हिवताप यासारखे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. गळक्या भिंतीची समस्या कायम आहे. त्यामुळे प्रवाशांना पायºया चढणे आणि उतरण्यासाठी अक्षरश: जीव मुठीत धरून चालावे लागते. भिकाºयांची वर्दळ असून स्टेशनच्या आवारात ठाणे -बेलापूर महामार्गालगत झाडांच्या फांद्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत.ऐरोली रेल्वे स्टेशनऐरोली रेल्वे स्थानकात फारशी सुधारणा आहे. स्थानकाबाहेर माती आणि डेब्रिजचे ढिगारे आणि भिंतींची गळतीची समस्या वगळता जवळपास काहीच समस्या नाहीत. फलाट क्र . दोनवर स्टेशनचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांना चढताना आणि उतरताना त्रास सहन करावा लागतो.मुंबईच्या सेंट्रल रेल्वेप्रमाणे नवी मुंबईत बºयाचशा रेल्वे स्टेशन १0८ क्र मांकाची रु ग्णवाहिका सेवा उपलब्ध नाही. ती सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांच्या वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी फार चांगली सोय होईल. तसेच कोपरखैरणे स्टेशन परिसरात उन्हा-पावसाच्या सुरक्षिततेसाठी शेड उभारले आहेत, त्याप्रमाणे इतर रेल्वे स्थानकात शेड लावल्यास रेल्वेने प्रवास करणाºया हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल यात तिळमात्र शंका नाही.- संजय सावंत,प्रभारी घणसोली रेल्वे स्टेशन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई