शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

नेरळमध्ये वाहतूक कोंडी

By admin | Updated: October 26, 2015 00:55 IST

नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने

कर्जत : नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. एकेरी मार्गाची कठोरपणे अंमलबजावणी आणि रस्त्यावरील असलेली अतिक्रमणे यावर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.नेरळ हे रायगड जिल्ह्यातील शहरीकरण झपाट्याने झालेले गाव आहे. वीस हजारांच्या घरात लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये ग्रामपंचायत कारभार करीत आहे. ग्रामपंचायत असून देखील परिसरातील ५० गावे वाड्यांतील नागरिक बाजारहाटासाठी नेरळ येथेच येतात. या बाजारपेठेत रस्त्यावर अनेक विक्रेत्यांनी अतिक्र मण केले आहे. त्या समस्येबरोबर येथील रस्त्यांची आणखी एक मोठी समस्या म्हणजे रस्त्यावर बांधकामे करून केलेले अतिक्र मण ही आजची नाही तर ३० -३५ वर्षांपासूनची समस्या आहे. ती समस्या प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील नेरळ -माथेरान रस्त्यावरील आहे. हा रस्ता खांडा पूल येथून सुरु होतो आणि जकात नाक्यापर्यंत भागात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्र मण आहे. याच रस्त्यावरून सर्वांची वहिवाट असल्याने येथील वाहतुकीची समस्या सर्वांना त्रासदायक ठरत आहे. सर्वाधिक अडथळे येतात ते रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकीमुळे, तसेच काही वेळा तेथे एखादी मोठी गाडी उभी असेल तर वाट काढणे अत्यंत कठीण होते. नेरळ ग्रामपंचायतीने नियोजन करून हा बुधवारचा आठवडी बाजार दोन महिन्यांपासून जुनी बाजारपेठेत शिवाजी महाराज चौकपासून डॉ. लाड यांचा दवाखाना या भागात हलविला, त्यामुळे पूर्वी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. नेरळमध्ये येणारे लोक हे प्रामुख्याने पूर्व भागातून येत असतात, त्यामुळे रेल्वेगेटपासून अंबिकानाका आणि मिनीट्रेन गेटपासून लोकमान्य टिळक चौक तसेच वाचनालयापासून नेरळ ग्रामपंचायत हे तीन रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. कारण माथेरान-नेरळ रस्त्याने आल्यानंतर नेरळ रेल्वे गेट येथे जाण्यासाठी अंबिका नाका येथून पुढे जावे लागते. मात्र अनेक वाहने टिळक चौकातून नो एंट्रीमध्ये घुसतात आणि वाहतूक कोंडी करून ठेवतात, कारण त्या रस्त्याने केवळ कल्याण-कर्जत रस्त्याकडे जाण्याची परवानगी आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने प्रामुख्याने सर्व बँकांच्या समोर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक समस्येकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)