शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

नेरळमध्ये वाहतूक कोंडी

By admin | Updated: October 26, 2015 00:55 IST

नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने

कर्जत : नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. एकेरी मार्गाची कठोरपणे अंमलबजावणी आणि रस्त्यावरील असलेली अतिक्रमणे यावर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.नेरळ हे रायगड जिल्ह्यातील शहरीकरण झपाट्याने झालेले गाव आहे. वीस हजारांच्या घरात लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये ग्रामपंचायत कारभार करीत आहे. ग्रामपंचायत असून देखील परिसरातील ५० गावे वाड्यांतील नागरिक बाजारहाटासाठी नेरळ येथेच येतात. या बाजारपेठेत रस्त्यावर अनेक विक्रेत्यांनी अतिक्र मण केले आहे. त्या समस्येबरोबर येथील रस्त्यांची आणखी एक मोठी समस्या म्हणजे रस्त्यावर बांधकामे करून केलेले अतिक्र मण ही आजची नाही तर ३० -३५ वर्षांपासूनची समस्या आहे. ती समस्या प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील नेरळ -माथेरान रस्त्यावरील आहे. हा रस्ता खांडा पूल येथून सुरु होतो आणि जकात नाक्यापर्यंत भागात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्र मण आहे. याच रस्त्यावरून सर्वांची वहिवाट असल्याने येथील वाहतुकीची समस्या सर्वांना त्रासदायक ठरत आहे. सर्वाधिक अडथळे येतात ते रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकीमुळे, तसेच काही वेळा तेथे एखादी मोठी गाडी उभी असेल तर वाट काढणे अत्यंत कठीण होते. नेरळ ग्रामपंचायतीने नियोजन करून हा बुधवारचा आठवडी बाजार दोन महिन्यांपासून जुनी बाजारपेठेत शिवाजी महाराज चौकपासून डॉ. लाड यांचा दवाखाना या भागात हलविला, त्यामुळे पूर्वी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. नेरळमध्ये येणारे लोक हे प्रामुख्याने पूर्व भागातून येत असतात, त्यामुळे रेल्वेगेटपासून अंबिकानाका आणि मिनीट्रेन गेटपासून लोकमान्य टिळक चौक तसेच वाचनालयापासून नेरळ ग्रामपंचायत हे तीन रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. कारण माथेरान-नेरळ रस्त्याने आल्यानंतर नेरळ रेल्वे गेट येथे जाण्यासाठी अंबिका नाका येथून पुढे जावे लागते. मात्र अनेक वाहने टिळक चौकातून नो एंट्रीमध्ये घुसतात आणि वाहतूक कोंडी करून ठेवतात, कारण त्या रस्त्याने केवळ कल्याण-कर्जत रस्त्याकडे जाण्याची परवानगी आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने प्रामुख्याने सर्व बँकांच्या समोर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक समस्येकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)