शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमध्ये वाहतूक कोंडी

By admin | Updated: October 26, 2015 00:55 IST

नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने

कर्जत : नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. एकेरी मार्गाची कठोरपणे अंमलबजावणी आणि रस्त्यावरील असलेली अतिक्रमणे यावर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.नेरळ हे रायगड जिल्ह्यातील शहरीकरण झपाट्याने झालेले गाव आहे. वीस हजारांच्या घरात लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये ग्रामपंचायत कारभार करीत आहे. ग्रामपंचायत असून देखील परिसरातील ५० गावे वाड्यांतील नागरिक बाजारहाटासाठी नेरळ येथेच येतात. या बाजारपेठेत रस्त्यावर अनेक विक्रेत्यांनी अतिक्र मण केले आहे. त्या समस्येबरोबर येथील रस्त्यांची आणखी एक मोठी समस्या म्हणजे रस्त्यावर बांधकामे करून केलेले अतिक्र मण ही आजची नाही तर ३० -३५ वर्षांपासूनची समस्या आहे. ती समस्या प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील नेरळ -माथेरान रस्त्यावरील आहे. हा रस्ता खांडा पूल येथून सुरु होतो आणि जकात नाक्यापर्यंत भागात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्र मण आहे. याच रस्त्यावरून सर्वांची वहिवाट असल्याने येथील वाहतुकीची समस्या सर्वांना त्रासदायक ठरत आहे. सर्वाधिक अडथळे येतात ते रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकीमुळे, तसेच काही वेळा तेथे एखादी मोठी गाडी उभी असेल तर वाट काढणे अत्यंत कठीण होते. नेरळ ग्रामपंचायतीने नियोजन करून हा बुधवारचा आठवडी बाजार दोन महिन्यांपासून जुनी बाजारपेठेत शिवाजी महाराज चौकपासून डॉ. लाड यांचा दवाखाना या भागात हलविला, त्यामुळे पूर्वी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. नेरळमध्ये येणारे लोक हे प्रामुख्याने पूर्व भागातून येत असतात, त्यामुळे रेल्वेगेटपासून अंबिकानाका आणि मिनीट्रेन गेटपासून लोकमान्य टिळक चौक तसेच वाचनालयापासून नेरळ ग्रामपंचायत हे तीन रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. कारण माथेरान-नेरळ रस्त्याने आल्यानंतर नेरळ रेल्वे गेट येथे जाण्यासाठी अंबिका नाका येथून पुढे जावे लागते. मात्र अनेक वाहने टिळक चौकातून नो एंट्रीमध्ये घुसतात आणि वाहतूक कोंडी करून ठेवतात, कारण त्या रस्त्याने केवळ कल्याण-कर्जत रस्त्याकडे जाण्याची परवानगी आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने प्रामुख्याने सर्व बँकांच्या समोर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक समस्येकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)