शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा मार्केटमध्ये वाहतूकदारांचा बंद; रिक्षातून मालवाहतुकीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:32 IST

दुपारी २ वाजेपर्यंत व्यवहार ठप्प

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाहतूकदारांनी बुधवारी अचानक बंद केला. यामुळे दुपारपर्यंत मार्केटमधील व्यवहार ठप्प होते. रिक्षातून सुरू असलेल्या माल वाहतुकीला वाहतूकदार संघटेनेने विरोध केला असून, संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही महिन्यांपासून प्रवासी वाहतूक सुरू असलेल्या रिक्षांमधून माल वाहतूक सुरू आहे. रिक्षांमधून मालवाहतूक बंद करण्याची मागणी लॉरी-टेम्पो ओनर्स असोसिएशनने केली होती. याविषयी वारंवार बाजार समितीकडे तक्रार केली होती. डिसेंबरमध्येही याविषयी बैठक झाली होती. प्रशासनाने रिक्षाला बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. मंगळवारी रिक्षाचालकाची व टेम्पो चालकामध्ये शाब्दिक वाद झाला, यामुळे संतापलेल्या वाहतूकदारांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. वाहतूकदारांच्या संपामुळे मार्केटमधील कामकाज ठप्प झाले होते.

बंदची दखल घेऊन बाजार समिती प्रशासनाने तत्काळ वाहतूकदारांची भेट घेतली. या विषयावर चर्चा करण्यासाठी २३ जानेवारीला बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये संघटनेचे पदाधिकारी अमर शेलार, महेश गव्हाणे, पोपट पवार, शिवाजी मोरे, अस्लम इनामदार, गणपत जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.