शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्याची गुंडगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:39 IST

भाजी मार्केटमध्ये अवैधपणे कांदा-बटाट्याचा व्यापार करणाऱ्या सागर बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भाजी मार्केटमध्ये अवैधपणे कांदा-बटाट्याचा व्यापार करणाऱ्या सागर बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. सुरक्षा अधिकाऱ्यांना व एपीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चोर असल्याचे संबोधत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या गेटवर व मार्केटमध्येही अनधिकृतपणे कांदा-बटाट्याची विक्री केली जात आहे. व्यापार करणारे सुरक्षारक्षकांना व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून बिनधास्तपणे व्यापार करत आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेरील मुख्य रस्ताही अडविला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यापूर्वी राजेंद्र बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. प्रत्येक वेळी सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली आहे. काही वेळा एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही दिल्या आहेत; परंतु शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनीही प्रत्येक वेळी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. बाजार समितीचे अध्यक्ष, सचिव व मुख्य सुरक्षा अधिकारीही कधीच सुरक्षारक्षकांच्या पाठीशी उभे राहात नाहीत. गुरुवारी पहाटे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बारवे यांच्या गाडीवर कारवाई केली होती. या कारवाईचा राग येऊन राजेंद्र बारवे यांचा मुलगा सागर बारवे घटनास्थळी येऊन त्याने सुरक्षा कर्मचारी भीमराव पाटील यांना व इतरांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कारवाई काय केली, असा जाब विचारला. मार्केटमध्ये चोरी करणाऱ्यांना तुमचे अधिकारी काही करत नाहीत. अधिकारी चोर आहेत. आम्हाला काय शिकविता. तुम्हाला सर्वांना बघून घेतो, अशा प्रकारची धमकी देऊन या प्रकाराचे चित्रीकरण करणाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. या प्रकाराविषयी पाटील यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदविली आहे. सागर बारवे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे कर्मचारी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली असून व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. सुरक्षारक्षकांना वाली नाहीएपीएमसीमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. त्यांच्या कामामध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे. अध्यक्ष, सचिव व मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सुरक्षा विभागाचे मनोबल वाढविण्यासाठी काहीही केले जात नाही. कोणी तक्रार केली की सुरक्षारक्षकांना बोर्डात पाठविण्याचा इशारा दिला जात असून त्यांना धमकावणाऱ्यांवर मात्र कडक कारवाई केली जात नसल्याने कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.