शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

माथेरानमध्ये शासकीय कामांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर सुविधा

By admin | Updated: May 10, 2017 00:16 IST

येथील काही कामे करावयाची झाल्यास सनियंत्रण समितीला विचारणा केल्याशिवाय कुठलीही कामे मार्गी लागत नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : येथील काही कामे करावयाची झाल्यास सनियंत्रण समितीला विचारणा केल्याशिवाय कुठलीही कामे मार्गी लागत नव्हती. काही वर्षे ही समिती अस्तित्वात नसल्याने अनेक विकासकामे प्रलंबित राहिली आहेत. पुन्हा ही समिती आपल्या पदावर येऊन कार्यरत झाल्याने शनिवारी येथे विशेष बैठकीचे आयोजन नगरपालिकेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी माथेरानमध्ये जरी मोटार वाहनांस बंदी असली तरीसुद्धा येथील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपयुक्त सोयी-सुविधा देणे शासनाला आता क्र मप्राप्तच झाल्यामुळे तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी घेऊनच येथे गावात अंतर्गत शासकीय कामांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर सुविधा पुरविण्यासाठी सनियंत्रण समितीने तत्त्वत: मान्यता दिल्यामुळे अनेक समस्या निमित्ताने मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच यासाठी नगरपालिकेने ठराव केलेला आहे. सनियंत्रण समितीने येथील एकंदरीतच भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन नेहमीच उद्भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिल्यामुळे येथील काही अंशी का होईना आगामी काळातच हे पर्यटनस्थळ विकासाच्या वाटेवर दिसणार असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त नगरपालिकेस वाहतुकीसाठी एक कोटी रु पये खर्च होतात. ट्रॅक्टरमुळे ही एक कोटी रु पयांची बचत होणार आहे. हा पैसा अन्य ठिकाणी विकासासाठी वापरण्यात येईल, याच माध्यमातून अन्नधान्य, दूध, भाजीपाला, शासकीय साहित्य, कचरा वाहतूक तसेच अत्यावश्यक साहित्याची वाहतूक केली जाणार आहे.येथील घोड्यांच्या लीदमिश्रित धुळीने सर्वत्र मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. याचा नाहक त्रास येथील दुकानदार,व्यावसायिक निमूटपणे सहन करीत आहेत. यासाठी मुख्य रस्ता असणाऱ्या टपाल पेटी नाका ते रिगल हॉटेलपर्यंतच्या महात्मा गांधी मार्गावरून घोड्यांना पूर्णत: बंदी करण्याच्या निर्णयाला सुद्धा तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ई-रिक्षासंदर्भात पुढील महिन्यात होणाऱ्या विशेष सभेत चर्चा करण्यात येणार आहे. माथेरानला नव्या युगात नेण्यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णयांना तत्वत: मान्यता मिळाल्यामुळे आणि येथील एकंदरीतच परिस्थितीचे गांभीर्यही लक्षात घेऊनच अनेक विषयांना मार्गी लावण्यासाठी या समितीने सकारात्मकता दाखवल्यामुळे पर्यटनवृद्धी होऊन सर्वांच्या रोजगारात भर पडणार आहे. भविष्यात हे पर्यटनस्थळ देखील अन्य पर्यटनस्थळांच्या बरोबरीने विकासाच्या वाटेवर जाणार आहे.एकंदरीतच यावेळेस सनियंत्रण समितीने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सकारात्मकता दाखवली आहे, यामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.यावेळेस सनियंत्रण समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा सत्कार नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधर, गटनेता प्रसाद सावंत, मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप यांच्या हस्ते करण्यात आला. या विशेष बैठकीसाठी समितीचे चेअरमन वासुदेव गोरडे, सचिव शीतल तेली- उगले आदी उपस्थित होते.