शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

संगणकाविना तब्बल ५१ शाळा

By admin | Updated: January 14, 2017 07:07 IST

तालुक्यातील ग्रामपंचायती लवकरच बॉडबॅण्डने जोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील शाळांमध्येही डिजिटलायझेशनवर

मयूर तांबडे / पनवेलतालुक्यातील ग्रामपंचायती लवकरच बॉडबॅण्डने जोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील शाळांमध्येही डिजिटलायझेशनवर भर देण्यात येत असला तरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांमध्ये संगणक नसल्याची माहिती समोर आली आहे. तर ७३ शाळांमध्ये ११५ संगणक बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे संगणकाविना विद्यार्थी ई-लर्निंगचे शिक्षण कसे घेणार असा प्रश्न उद्भवत आहे. पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २५२ शाळा आहेत. यातील ७३ शाळांत ११५हून अधिक ठिकाणी संगणक नादुरु स्त होऊन धूळखात पडले आहेत. तर ५१ शाळांमध्ये संगणकच नाहीत. एकीकडे विद्यार्थ्यांना संगणकांची माहिती व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रु पये खर्च करीत असताना जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये मात्र स्मार्ट शिक्षकाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. काही शाळांत संगणक आहेत; मात्र ते बंद असतात. काही शाळांतील संगणक केवळ शिक्षकांकडून चालवले जातात. त्यामुळे मुलांना संगणकाचे शिक्षण देणे तर दूरच राहते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, ते स्पर्धेच्या युगात टिकावेत यासाठी वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांनाही संगणक शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पनवेलमधील ५१ शाळांमध्ये संगणकच नसल्याने शाळा डिजिटल कशा होतील? असा प्रश्न विचारला जात आहे. ई-लर्निंगमधून पनवेलमधील काही शाळांना संगणक मिळाले आहेत. सध्या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २०१ शाळांत ३६४ संगणक आहेत. यापैकी जवळपास ४० टक्के संगणकांची अवस्था बिकट आहे. काही ठिकाणी किरकोळ दुरु स्तीच्या प्रतीक्षेत संगणक अनेक दिवसांपासून शाळांमध्ये पडून आहेत, तर काही शाळांमध्ये संगणकाबाबत असलेल्या अज्ञानामुळे संगणक धूळखात पडून आहेत. संगणकांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संगणक साक्षरता व्हावी, हा शाळांना संगणक देण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. शिक्षकांनाही अद्ययावत ज्ञान मिळावे, यादृष्टीनेच शाळांना संगणक पुरविण्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. सध्या शालेय शिक्षणापासून महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे देण्याची सक्ती केली, तरी आज शहरांसोबत ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये संगणक आलेले नाहीत. अनेक शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणक शिकण्याची इच्छा असल्यामुळे काही शाळांमध्ये संस्थांनी संगणक उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, प्रशिक्षण देणारे शिक्षकच नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये संगणक धूळखात पडले असल्याचे समोर आले आहे. शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा तेथे संगणक असणे गरजेचे असतानाही शाळेत संगणकांची सोयच नसल्याने हजारो विद्यार्थी या संगणकाच्या ज्ञानापासून वंचित आहेत. देशभरात डिजिटल इंडिया राबवीत असताना शाळेत संगणक नसतील, तर शाळा डिजिटल कशा करायच्या? पनवेलमधील काही शाळांमध्ये विजेची समस्या आहे. त्यामुळे शाळांना अडचणी येत आहेत. काही शाळेत रोटरी क्लब, ग्रामपंचायत निधीतून संगणक दिले आहेत. तर काही शाळांमध्ये ग्रामस्थांनी वर्गणी काढून संगणक दिले आहेत. मात्र, अद्यापही तालुक्यातील काही शाळांतील विद्यार्थी संगणकापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.