शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पारंपारिक शेतीला अधुनिक तंत्राची जोड देण्यास प्रोत्साहन देणार : अब्दुल सत्तार 

By नामदेव मोरे | Updated: October 11, 2022 14:33 IST

नैसर्गिक शेतीला चालना देणार असल्याचं सत्तार यांचं वक्तव्य.

नवी मुंबई: पारंपारिक शेतीला अधुनिक तंत्राची जोड देऊन उत्पादन क्षमता वाढविण्यावर राज्य सरकार भर देणार आहे. कृषीमालाला चांगला भाव व शेतीसाठी पायाभूत सुविधा पुरवून शेतकरी आत्महत्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यात नैसर्गिक शेतीसाठीही प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे मत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.

बाॅम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात पुरवठादार व खरेदी संस्थांची द्वैवार्षिक सभा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. "राज्यातील सरकार शेतऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यात कटीबद्ध आहे. राज्यात रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेती वाढविली जाईल. नैसर्गिक शेतीचे प्रमाण २५ हजार हेक्टर पर्यंत वाढविले जाईल. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल," असे ते यावेळी म्हणाले.

राज्यात खाद्यतेल उत्पादनात वाढ केली जाईल. तेलघाणे वाढविले जातील असे मतही त्यांनी व्यक्त केले. नवी मुंबईत आयोजित दोन दिवसाच्या प्रदर्शनात राज्यातील शेतकरी संस्थांनी सहभाग घेतला आहे.

बाळासाहेबांचे नाव मिळाले याचा आनंद. आमची सेना हिच खरी शिवसेना आहे. आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले याचा आनंद आहे. कोण टिकणार हे निवडणुकीतून स्पष्ट होईल असे मतही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारNavi Mumbaiनवी मुंबई