शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत व्यापाऱ्यांची सुरक्षेसाठी कंजुसी

By admin | Updated: November 16, 2015 02:22 IST

मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. रोज करोडो रूपयांचे व्यवहार करणारे व्यापारी सुरक्षेवरील खर्चात मात्र कंजुसी करत आहेत.

नामदेव मोरे , नवी मुंबई मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. रोज करोडो रूपयांचे व्यवहार करणारे व्यापारी सुरक्षेवरील खर्चात मात्र कंजुसी करत आहेत. मार्केटमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नाही. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून त्यामुळे आग व इतर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यानंतर सर्वाधिक उलाढाल मसाला मार्केटमध्ये होते. श्रीमंतांचे मार्केट म्हणूनही ओळख आहे. परंतु दिवाळीदिवशी लागलेल्या आगीमुळे मार्केटमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. ज्या गाळ्याला आग लागली तेथे बेकायदेशीरपणे बदाम फोडण्याचा कारखाना सुरू केला होता. यासाठी महापालिकेचा परवाना घेतलेला नव्हता. छतावरही मशीन बसविण्यात आल्या होत्या. आग लागलेला गाळाच नाही तर पूर्ण मार्केटमधीलच नाही, अनेक व्यापारी नियम धाब्यावर बसवत आहेत. ८० टक्के व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. गाळ्यावर दोन मजले तयार करून त्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. माळ्यांवर जाण्यासाठी एक अरूंद शिडी ठेवण्यात आली आहे. सर्व ठिकाणी दाटीवाटीने माल ठेवण्यात येत असून आग किंवा इतर दुर्घटना झाली तर काम करणाऱ्यांना खाली उतरण्यासाठी जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांकडे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. मसाला मार्केटमधील ई विंगमध्ये किराणा साहित्याची किरकोळ विक्री केली जाते. या व्यापाऱ्यांनी दोन्ही गाळ्यांच्या मध्ये असणाऱ्या जागेमध्ये साहित्य ठेवले आहे. यामुळे ये - जा करणाऱ्या नागरिकांना अडचण होत आहे. पूर्ण मार्केटमध्ये रोज करोडो रूपयांचे व्यवहार होत आहेत. परंतु व्यापाऱ्यांनी अग्निसुरक्षेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. गाळ्यांमध्ये फायर इस्टिंगविशरही नाही. मार्केटमध्ये ६६० गोडावून व मध्यवर्ती सुविधागृह इमारतीमध्ये २७३ गाळे आहेत. परंतु एकाही ठिकाणी आग लागल्यास ती तत्काळ विझविता येईल अशी काहीच यंत्रणा नाही. दुर्घटना घडली की व्यापारी बाजार समिती प्रशासनाला दोष देतात. प्रशासनावर दबाव आणून सर्व चुकांचे खापर त्यांच्या माथी मारले जाते. परंतु स्वत: मात्र सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना करत नाहीत. व्यापाऱ्यांच्या या उदासीनतेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई अग्निशमन दलाने यापूर्वीही एपीएमसीला अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आतापर्यंत पाठविलेल्या सर्व पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांवर व एपीएमसी प्रशासनावरही कारवाई करावी, अशी मागणी होवू लागली आहे.