शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

श्रीमंत व्यापाऱ्यांची सुरक्षेसाठी कंजुसी

By admin | Updated: November 16, 2015 02:22 IST

मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. रोज करोडो रूपयांचे व्यवहार करणारे व्यापारी सुरक्षेवरील खर्चात मात्र कंजुसी करत आहेत.

नामदेव मोरे , नवी मुंबई मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. रोज करोडो रूपयांचे व्यवहार करणारे व्यापारी सुरक्षेवरील खर्चात मात्र कंजुसी करत आहेत. मार्केटमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नाही. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून त्यामुळे आग व इतर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यानंतर सर्वाधिक उलाढाल मसाला मार्केटमध्ये होते. श्रीमंतांचे मार्केट म्हणूनही ओळख आहे. परंतु दिवाळीदिवशी लागलेल्या आगीमुळे मार्केटमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. ज्या गाळ्याला आग लागली तेथे बेकायदेशीरपणे बदाम फोडण्याचा कारखाना सुरू केला होता. यासाठी महापालिकेचा परवाना घेतलेला नव्हता. छतावरही मशीन बसविण्यात आल्या होत्या. आग लागलेला गाळाच नाही तर पूर्ण मार्केटमधीलच नाही, अनेक व्यापारी नियम धाब्यावर बसवत आहेत. ८० टक्के व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. गाळ्यावर दोन मजले तयार करून त्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. माळ्यांवर जाण्यासाठी एक अरूंद शिडी ठेवण्यात आली आहे. सर्व ठिकाणी दाटीवाटीने माल ठेवण्यात येत असून आग किंवा इतर दुर्घटना झाली तर काम करणाऱ्यांना खाली उतरण्यासाठी जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांकडे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. मसाला मार्केटमधील ई विंगमध्ये किराणा साहित्याची किरकोळ विक्री केली जाते. या व्यापाऱ्यांनी दोन्ही गाळ्यांच्या मध्ये असणाऱ्या जागेमध्ये साहित्य ठेवले आहे. यामुळे ये - जा करणाऱ्या नागरिकांना अडचण होत आहे. पूर्ण मार्केटमध्ये रोज करोडो रूपयांचे व्यवहार होत आहेत. परंतु व्यापाऱ्यांनी अग्निसुरक्षेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. गाळ्यांमध्ये फायर इस्टिंगविशरही नाही. मार्केटमध्ये ६६० गोडावून व मध्यवर्ती सुविधागृह इमारतीमध्ये २७३ गाळे आहेत. परंतु एकाही ठिकाणी आग लागल्यास ती तत्काळ विझविता येईल अशी काहीच यंत्रणा नाही. दुर्घटना घडली की व्यापारी बाजार समिती प्रशासनाला दोष देतात. प्रशासनावर दबाव आणून सर्व चुकांचे खापर त्यांच्या माथी मारले जाते. परंतु स्वत: मात्र सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना करत नाहीत. व्यापाऱ्यांच्या या उदासीनतेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई अग्निशमन दलाने यापूर्वीही एपीएमसीला अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आतापर्यंत पाठविलेल्या सर्व पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांवर व एपीएमसी प्रशासनावरही कारवाई करावी, अशी मागणी होवू लागली आहे.