शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:39 IST

पनवेलमध्ये मोठ्या संख्येने घरे रिकामीच

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग :  कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कामगार गावी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे पनवेल पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात घरे आणि खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील अनेक व्यक्तींनी गुंतवणूक म्हणून खारघरसारख्या मोठ्या शहरात घरे घेऊन ठेवली आहेत. चार लाखांहून अधिक लोकवस्ती असलेल्या खारघर शहर आणि गावात अंदाजे पन्नास हजारांहून अधिक भाडेकरू वास्तव्यास आहेत. तर परिसरातील खारघर, कोपरा, बेलपाडा, मुर्बी, पेठ, ओवे आदी गावांतील प्रकल्पग्रस्तांचा रोजगार गेल्यामुळे खोली भाड्याने देऊन उदरनिर्वाह करीत आहेत. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्यामुळे कामगार गावी स्थलांतरित झाले. त्यामुळे खारघर परिसरात खोल्या रिकाम्या आहेत.

रिकाम्या घरांची देखभाल आणि वीजबिल घरमालकाला येत असल्यामुळे घरमालक, इस्टेट एजंट तसेच ओळखीच्या व्यक्तीकडे हजार, दोन हजार रुपये भाडे कमी असेल तरी चालेल, मात्र भाडेकरू शोधून घर भाड्याने द्यावे, अशी मागणी करीत आहेत. खारघर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता. दरवर्षी पाच हजारांहून अधिक भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात होते. अनेक भाडेकरू भाडेकराराची मुदत संपल्यावर परस्पर मुदत वाढवून घेतात. मात्र गेल्या सहा महिन्यांत खूप कमी भाडेकरार केल्याचे दिसून येते.

खारघर परिसरातील गावात ग्रामस्थाने बांधकाम केलेल्या खोलीमध्ये घरकाम, मजूर, रंगकाम, सुतार, गवंडी तसेच छोट्यामोठ्या पगारावर काम करणारे भाडेकरू राहत असत. मागील मार्च महिन्यापासून रोजगार गेल्यामुळे अनेक ग्रामस्थांनी भाडेकरूंचे घरभाडे माफ केले. अजूनही  काम सुरू झाले नाही. त्यामुळे स्थलांतर झालेले कामगार फिरकले नाहीत.     - अभिमन्यू तोडेकर, ग्रामस्थ