शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

तीन मनपांत दूषित पाणी

By admin | Updated: July 4, 2014 03:42 IST

ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे नमुने तपासणाऱ्या राज्य प्रयोगशाळेने तसा अहवाल जिल्हाधिकारी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवला असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. राज्य प्रयोगशाळेमध्ये राज्यभरातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या पाण्याची अणुजैविक तसेच रासायनिक पद्धतीने तपासणी केली जात असते. त्यासाठी पालिका हद्दीत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने मागवण्यात येत असतात. त्यानुसार मे महिन्यात ठाणे, उल्हासनगर, वसई-विरारसह राज्यभरातील अनेक मनपा आणि नगरपालिकांकडून पाण्याचे नमुने मागवून त्यांची तपासणी केली होती. यापैकी ठाणे आणि नवी मुंबई पालिकांच्या स्वत:च्या प्रयोगशाळा आहेत. तरीही, राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी करणे बंधनकारक असल्यामुळे ही तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ठाणे, उल्हासनगर तसेच वसई-विरार महापालिकांच्या वतीने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी १० टक्के पाणीपुरवठा दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.या दूषित पाण्यामुळे शहरात पटकी, कॉलरा, मलेरिया, कावीळ अशा आजारांमध्ये भरच पडत असल्याचे दिसत आहे. पाणी प्रदूषण कायद्यान्वये नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असा दंडक आहे. हा नियम पालिका पाळतात की नाही, हे तपासण्यासाठी राज्य आरोग्य शाळेकडून ठरावीक कालावधीमध्ये पाण्याची तपासणी होत असते. त्याचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी आणि पालिकांच्या प्रशासनाला पाठवण्यात येत असतो. ठाणे, वसई-विरार तसेच उल्हासनगर पालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा अहवाल या प्रयोगशाळेने मे महिन्याच्या अखेरीस पाठवला. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. (प्रतिनिधी)