शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तीन मनपांत दूषित पाणी

By admin | Updated: July 4, 2014 03:42 IST

ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे नमुने तपासणाऱ्या राज्य प्रयोगशाळेने तसा अहवाल जिल्हाधिकारी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवला असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. राज्य प्रयोगशाळेमध्ये राज्यभरातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या पाण्याची अणुजैविक तसेच रासायनिक पद्धतीने तपासणी केली जात असते. त्यासाठी पालिका हद्दीत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने मागवण्यात येत असतात. त्यानुसार मे महिन्यात ठाणे, उल्हासनगर, वसई-विरारसह राज्यभरातील अनेक मनपा आणि नगरपालिकांकडून पाण्याचे नमुने मागवून त्यांची तपासणी केली होती. यापैकी ठाणे आणि नवी मुंबई पालिकांच्या स्वत:च्या प्रयोगशाळा आहेत. तरीही, राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी करणे बंधनकारक असल्यामुळे ही तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ठाणे, उल्हासनगर तसेच वसई-विरार महापालिकांच्या वतीने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी १० टक्के पाणीपुरवठा दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.या दूषित पाण्यामुळे शहरात पटकी, कॉलरा, मलेरिया, कावीळ अशा आजारांमध्ये भरच पडत असल्याचे दिसत आहे. पाणी प्रदूषण कायद्यान्वये नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असा दंडक आहे. हा नियम पालिका पाळतात की नाही, हे तपासण्यासाठी राज्य आरोग्य शाळेकडून ठरावीक कालावधीमध्ये पाण्याची तपासणी होत असते. त्याचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी आणि पालिकांच्या प्रशासनाला पाठवण्यात येत असतो. ठाणे, वसई-विरार तसेच उल्हासनगर पालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा अहवाल या प्रयोगशाळेने मे महिन्याच्या अखेरीस पाठवला. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. (प्रतिनिधी)