शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

तीन मनपांत दूषित पाणी

By admin | Updated: July 4, 2014 03:42 IST

ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे नमुने तपासणाऱ्या राज्य प्रयोगशाळेने तसा अहवाल जिल्हाधिकारी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवला असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. राज्य प्रयोगशाळेमध्ये राज्यभरातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या पाण्याची अणुजैविक तसेच रासायनिक पद्धतीने तपासणी केली जात असते. त्यासाठी पालिका हद्दीत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने मागवण्यात येत असतात. त्यानुसार मे महिन्यात ठाणे, उल्हासनगर, वसई-विरारसह राज्यभरातील अनेक मनपा आणि नगरपालिकांकडून पाण्याचे नमुने मागवून त्यांची तपासणी केली होती. यापैकी ठाणे आणि नवी मुंबई पालिकांच्या स्वत:च्या प्रयोगशाळा आहेत. तरीही, राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी करणे बंधनकारक असल्यामुळे ही तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ठाणे, उल्हासनगर तसेच वसई-विरार महापालिकांच्या वतीने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी १० टक्के पाणीपुरवठा दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.या दूषित पाण्यामुळे शहरात पटकी, कॉलरा, मलेरिया, कावीळ अशा आजारांमध्ये भरच पडत असल्याचे दिसत आहे. पाणी प्रदूषण कायद्यान्वये नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असा दंडक आहे. हा नियम पालिका पाळतात की नाही, हे तपासण्यासाठी राज्य आरोग्य शाळेकडून ठरावीक कालावधीमध्ये पाण्याची तपासणी होत असते. त्याचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी आणि पालिकांच्या प्रशासनाला पाठवण्यात येत असतो. ठाणे, वसई-विरार तसेच उल्हासनगर पालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा अहवाल या प्रयोगशाळेने मे महिन्याच्या अखेरीस पाठवला. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. (प्रतिनिधी)