शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

ज्वेलर्स लुटणाऱ्या टोळीच्या तिघांना अटक

By admin | Updated: June 17, 2017 02:14 IST

भिंतीला भगदाड पाडून दारावे येथील मयूरा ज्वेलर्समधील ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याची उकल करून नेरुळ पोलिसांनी सराईत टोळीच्या तिघांना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भिंतीला भगदाड पाडून दारावे येथील मयूरा ज्वेलर्समधील ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याची उकल करून नेरुळ पोलिसांनी सराईत टोळीच्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, सापडलेल्या रेल्वेच्या तिकिटावरून पोलिसांनी या टोळीचा शोध घेतला आहे.दारावे येथील मयूरा ज्वेलर्सची भिंत फोडून ५० लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला चाळीमध्ये भाडोत्री घर घेवून चोरट्यांनी दुसऱ्याच दिवशी त्याठिकाणी घरफोडी केली होती. सदर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी एक महिन्याच्या तपासाअंती तिघांना अटक केली आहे. अटक केलेले तिघेही झारखंडचे असून देशभर त्यांच्या टोळीने गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या ऐवजापैकी सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याचे सह आयुक्त प्रशांत बुरडे यांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून ज्वेलर्सची तसेच गुन्ह्यासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या घराची पाहणी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांच्या हाती रेल्वेचे तिकीट लागले होते. सानपाडा ते सीवूड दरम्यानच्या प्रवासाचे हे तिकीट होते. यावरून पोलिसांनी सानपाडा रेल्वेस्थानकातील त्या दिवशीचे सीसीटीव्ही तपासले व घटना घडली तेव्हाचे सीवूड स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. यावेळी ७ ते ८ संशयितांची माहिती नेरुळ पोलिसांच्या हाती लागली. यावरून उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भगुजी औटी, सहायक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, राजेश गज्जल यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते.पथकाने सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या संशयितांची छायाचित्रे तयार करून त्यांच्याविषयीची माहिती मिळवली. त्यापैकी काही जण झारखंडचे असल्याचे समजल्यानंतर मागील १५ दिवस नेरुळ पोलिसांचे पथक त्याठिकाणी सापळा रचून होते. अखेर जामनगर येथून तिघांना ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा उघड झाला. यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून, अशोक शर्मा (२९), सईद हुसेन नुर शेख (२२) व फिरोज इब्राहिम शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे इतर पाच साथीदार व चोरीचा माल घेणारे तिघे अशा ११ जणांचाही शोध सुरू असल्याचे पोलीस सह आयुक्त बुरडे यांनी सांगितले. एखाद्या ज्वेलर्सच्या बाजूचे घर अथवा गाळा भाड्याने मिळवून रात्रीच्या वेळी भिंत फोडून घरफोडी करण्याची त्यांची पध्दत आहे. अशाप्रकारे नवी मुंबईत यापूर्वी देखील काही ज्वेलर्स लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत.