शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

ऐरोलीतील गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 05:27 IST

ऐरोली येथील गोळीबारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई : ऐरोली येथील गोळीबारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. व्यावसायिक वादातून हत्येच्या उद्देशाने आलेल्या टोळीत त्यांचा समावेश होता. मात्र मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून रबाळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.रविवारी रात्री ऐरोली सेक्टर ९ येथे व्यवसायिक वादातून आदित्य क्षीरसागर याच्या हत्येच्या उद्देशाने त्याच्यावर गोळीबार झाला होता. हा हल्ला अमित भोगले याने केल्याचा दाट संशय आहे. क्षीरसागर व भोगले या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून मुलुंड येथील एका बांधकामाच्या साइटवरून गेली वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडत आहेत. त्यातूनच क्षीरसागर याचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने भोगलेने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु क्षीरसागरच्या हत्येच्या उद्देशाने आलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळीने बंदुकीतून दोन राउंड झाडूनही तो बचावला.याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी हॉटेलमधील सीसीटीव्ही ताब्यात घेतले होते. त्याद्वारे सोमवारी रात्री तिघांना मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरातून अटक करण्यात आली आहे. मंदार गावडे, साई घोगळे व नितेश साळवी अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २२ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी सांगितले.या तिघांचाही क्षीरसागरच्या हत्येसाठी आलेल्या टोळीत समावेश होता. मात्र या कटाचा संशयित मुख्य सूत्रधार भोगले अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून रबाळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.>भोईर यांची चौकशीयादरम्यान सोमवारी सकाळपासून ठाण्याचे शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांची देखील पोलिसांकडून चौकशी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चौकशीतूनही समाधान न झाल्याने ते देखील पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात आहेत.