शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

टोळधाडीने केले तीन एकर भातपीक फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:00 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : थळ्याचापाडा येथील प्रकार

पारोळ : भातपीक घेणारा शेतकरी शेतीचा वाढता खर्च, मजुरांची टंचाई, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आधीच संकटात असताना आता त्याच्यापुढे टोळधाडीचे नवे संकट उभे राहिले आहे. वसई तालुक्यातील थळ्याचापाडा येथील शेतकरी शांताराम जाधव यांच्या शेतातील तीन एकरमध्ये असणारे गरवे पीक टोळधाडीने फस्त केले आहे. या शेतात आता फक्त तण शिल्लक राहिले असून कृषी विभागाने शेताची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

भातपिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली असली तरी गरवे भातपीक अजूनही शेतात उभे आहे. आता या भातपिकावर टोळधाडीने आक्रमण केल्याने गरवे भातपीक धोक्यात आले आहे. यावर शेतकऱ्यांकडे उपाय नसल्याने यापासून भातपीक वाचवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हे कीटक भातरोपांतील रस शोषून घेत भाताचे कणीस निकामी करतात. त्यामुळे कणसांमध्ये दाणे न भरल्याने फक्त कणीस दिसते, पण दाणे नसतात. हे कीटक दोन ते तीन दिवसात शेत निकामी करतात. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवले आहे.

या तीन एकर जागेत दरवर्षी १०० मण भात पिकते, पण या वर्षी आलेल्या टोळधाडीमुळे आता हे पीक कापण्यायोग्यही राहिले नसून कृषी विभागाला याची माहिती दिली आहे, मात्र अजूनही दखल घेतली नाही.    - शांताराम जाधव, शेतकरी थळ्याचापाडा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड