शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

‘ त्या’ गावांचे स्थलांतर आता गणेशोत्सवानंतरच; १,७00 कुटुंबांनी मागितली मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:30 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित दहा गावांना स्थलांतरासाठी देण्यात आलेली मुदत ७ जुलै रोजी संपुष्टात आली आहे. या मुदतीपर्यंत केवळ १३00 कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित दहा गावांना स्थलांतरासाठी देण्यात आलेली मुदत ७ जुलै रोजी संपुष्टात आली आहे. या मुदतीपर्यंत केवळ १३00 कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. उर्वरित कुटुंबांनी पुनर्वसन पॅकेज धोरणानुसार तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन सिडकोच्या माध्यमातून करण्यात आले आहे. असे असले तरी गणेशोत्सवानंतरच स्थलांतर करणाच्या प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वासही सिडकोच्या सूत्राने व्यक्त केला आहे.विमानतळबाधित दहा गावातील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, करंजाडे व वरचा ओवळा येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी यासंदर्भात गेल्या महिन्यात ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्या शिल्लक मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेतले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी दिलेल्या मुदतीत आपली घरे रिकामी करून पुनर्वसन ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला ग्रामस्थांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दहा गावांपैकी पाच गावांतील ग्रामस्थांकडून स्थलांतराला प्रतिसाद मिळत आहे, परंतु उर्वरित पाच गावांतील ग्रामस्थ काही मागण्यांवर अडून बसल्याने या प्रक्रियेला खीळ बसल्याचे दिसून आले आहे.सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे विकासकाकडे अलीकडेच हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यानुसार जीव्हीके इंटरनॅशनल कंपनीने विमानतळाच्या विकासकामाला गती दिली आहे. डिसेंबर २0१९ मध्ये विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विकासक कंपनीसमोर आहे, परंतु विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असलेल्या दहा गावांच्या स्थलांतराला अपेक्षित गती मिळत नसल्याने सिडकोसह जीव्हीकेसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी संपर्क साधण्यचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.- पुनर्वसनाच्या ठिकाणी अद्याप पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. शाळा, हॉस्पिटल्स, तसेच पाणी या अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वप्रथम या सुविधा द्या, मगच स्थलांतर करू, असा पवित्रा वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. वरचा ओवळा हे गाव धावपट्टीच्या मुख्य गाभा क्षेत्रात असल्याने सर्वप्रथम या गावाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. असे असले, तरी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यानंतर, लगेच गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवानंतर येथील ग्रामस्थ नक्कीच स्थलांतर करतील, असा विश्वास सिडकोला वाटत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई