शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या आघाडीचा सूर

By admin | Updated: August 3, 2015 03:24 IST

डाव्या विचारांनी एकत्र येऊन जनतेला तिसरा पर्याय देणे गरजेचे आहे. या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस

अलिबाग : डाव्या विचारांनी एकत्र येऊन जनतेला तिसरा पर्याय देणे गरजेचे आहे. या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी करावे. डाव्या विचारांची ताकद त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. अलिबाग समुद्र किनारी शेकापचा ६८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते.अलिबाग शेतकरी भवन येथून शेकापच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली समुद्र किनारी आल्यावर तिचे सभेत रूपांतर झाले. ‘शेतकरी, कष्टकरी कामगारांचे नेतृत्व सीताराम येचुरी यांच्या रूपाने उदयास आले आहे. जनहिताचे कार्यक्रम आता त्यांच्या नेतृत्वाखाली आखले जातील,’ असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत शेकापची ९० टक्के सत्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत झोकून देऊन काम करा, असे आवाहन आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. देशात तिसरी आघाडी निर्माण व्हावी आणि त्याचे नेतृत्व सीताराम येचुरी यांनी करावे, त्याचप्रमाणे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा मृत्यू दिवस हा विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात यावा, या दोन मागण्या डाव्या विचारांच्या नेत्यांनी पूर्ण कराव्यात, अशी मागणी माजी आमदार विवेक पाटील यांनी केली.बाळगंगा आणि हेटवणे धरणाचे पाणी सरकार व्यापारीकरणासाठी देत असेल, तर हा लढा डाव्या राजकीय पक्षांनी एकत्र लढला पाहिजे, असे आवाहन आमदार धैर्यशील पाटील यांनी केले. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी केले. सीताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल शेकापच्या वतीने आमदार जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)