शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नवी मुंबई शहरात वाहनचोरांची गाडी सुसाट; मागील चार महिन्यांत ३५० घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 13:01 IST

नवी मुंबईस पनवेल परिसरात वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. प्रतिवर्षी हजारो वाहने नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातून चोरीला जात आहेत. मात्र, वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अल्प असल्याने ही वाहने जातात कुठे, असा प्रश्न पडत असतो.

नवी मुंबईस पनवेल परिसरात वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. सर्वत्र वाहन पार्किंगची योग्य खबरदारी घेतली जात नसल्याने रस्त्यावर, सोसायटी आवारात वाहने उभी केली जात आहेत. अशा वाहनांवर पाळत ठेवून चोरट्यांकडून ती बनावट चावी अथवा लॉक तोडून पळवली जात आहेत. त्यात दुचाकी, कार यांच्यासह रिक्षांचादेखील समावेश दिसू लागला आहे. चालू वर्षातदेखील सुमारे साडेतीनशे वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४५ ते ५० गुन्हे या चार महिन्यांत उघड झाले आहेत. त्यात शहराबाहेरील टोळ्यांचा सर्वाधिक हात समोर आला आहे. 

वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जात आहे. वाहनचोरी घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयितांचा आलेल्या व गेलेल्या मार्गाचा आढावा घेतला जात आहे. त्यातून काही टोळ्या पोलिसांच्या हातीदेखील लागल्या आहेत. शहरात वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

पन्नासहून अधिक वाहने हस्तगत मागील दीड महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी काही वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेसह परिमंडळ पोलिसांच्या पथकाने या कारवाया केल्या आहेत. त्यातून सुमारे ५० वाहने हस्तगत केली असून, त्यात दुचाकी, कार व रिक्षांचा समावेश आहे.