शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाच वर्षापासून ते उचलतात श्वानांची विष्ठा

By नामदेव मोरे | Updated: February 13, 2024 16:51 IST

स्वच्छता अभियानात योगदान, नवी मुंबईला नंबर वन बनविण्याचा निर्धार.

नामदेव मोरे,नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ मध्ये राहणारे इंदरसिंग ठाकूर हे दक्ष नागरिक पाच वर्षापासून रोज रोड व पदपथांवरील श्वानांची विष्ठा उचलण्याचे काम करत आहेत. शहर स्वच्छतेमध्ये प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे हे त्यांनी स्वकृतीतून दाखवून दिले आहे. नवी मुंबईला देशात नंबर १ बनविण्यासाठी त्यांच्या स्वच्छता अभियानातील या योगदानाचे शहरभर कौतुक होऊ लागले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये देशात दुसरा व राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. शहरवासीयांच्या सक्रीय सहभागामुळे प्रत्येक वर्षी शहरांचे मानांकन वाढत आहे. अनेक नागरिक स्वच्छतेने शहर स्वच्छतेमध्ये महत्वाचे योगदान देत आहेत. यामध्ये नेरूळ सेक्टर ४ मधील पामबीच सोसायटीत राहणाऱ्या इंदरसिंग ठाकूर यांचाही समावेश आहे. स्वत:च्या व्यवसाय व सोसायटीचे सेक्रेटरी असलेले ठाकून मागील पाच वर्षांपासून रोज पहाटे पाच वाजता उठून संपूर्ण सेक्टरमधील रोड व पदपथावरील श्वानांची विष्ठा साफ करण्याचे काम करत आहेत. विष्ठा गोणीमध्ये संकलीत करून ती मोकळ्या भूखंडावर खड्डा काढून त्यामध्ये टाकली जाते.

सकाळी परिसरातील पदपथ व रस्त्यावरून नागरिक मॉर्नींग वॉक करत असतात. दिवसभरही ये - जा सुरू असते. श्वानांच्या विष्ठेमुळे अनेकांचे पाय भरतात. चालण्यास अडथळे निर्माण होतात. दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमधून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी ठाकूर यांनी स्वच्छेने श्वानांची विष्ठा संकलीत करण्यास सुरुवात केली असून सातत्याने हे काम केले जात आहे. या कामाचे परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया :

स्वच्छता अभियानामध्ये आपले योगदान असावे या भुमीकेतून लॉकडाऊनच्या अगोदरपासून श्वानांची विष्ठा संकलीत करून परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. शहराचा नागरिक म्हणून कर्तव्य भावनेतून हे काम सुरू आहे.- इंदरसिंग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

काम सर्वांसाठी प्रेरणादायी :

नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता मोहन डगावकर यांनीही ठाकू यांच्या कामाचे कौतुक केले आहे. अशा प्रकारे प्रत्येक नागरिकाने अभियानात योगदान दिले तर शहर अजून स्वच्छ होईल. श्वान मालकांनीही रोड व पदपथावर कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMuncipal Corporationनगर पालिका