शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

योजना आली, पण पाणी नाहीच!

By admin | Updated: May 12, 2014 06:08 IST

कर्जत तालुक्यातील पिंपळोली ग्रामपंचायतीमधील अन्थ्राट आणि काळेवाडी या भागात भीषण पाणी टंचाईला तेथील महिलांना सामोरे जावे लागत आहे. तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये टिपलोन आली आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील पिंपळोली ग्रामपंचायतीमधील अन्थ्राट आणि काळेवाडी या भागात भीषण पाणी टंचाईला तेथील महिलांना सामोरे जावे लागत आहे. तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये आणि वाडीत टिपलोन आली आहे. पाण्यासाठी तेथील महिलांना कोरड्या पडलेल्या नदीमध्ये डबरे खोदावे लागले आहेत,तर काही ठिकाणी टेकडी उतरून पाणी डोक्यावरून आणावे लागत आहे दरम्यान, नळपाणी योजनेचे पाणी एकदाही पोहोचत नसल्याने आमच्यासाठी नवीन पाणी योजना द्यावी, अशी मागणे येथील ग्रामस्थ करु लागले आहेत. पिंपळोली ग्रामपंचायतीतील नळपाणी योजनेत समाविष्ट केलेल्या अन्थ्राट आणि काळेवाडीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही दोन्ही गावे शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सुगवे आणि सहा गावांच्या नळपाणी योजनेत समाविष्ट आहेत, मात्र अपवाद वगळता अन्थ्राट गावातील विहिरीत फार कमी वेळा नळपाणी योजनेचे पाणी पोहचले आहे. दुसरीकडे काळेवाडीमध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचलेलेच नसल्याने नळपाणी योजनेत आम्ही केवळ नामधारी आहोत, असा आरोप अंंथ्राटचे ग्रामस्थ करीत आहेत . सुगवे नळपाणी योजनेचे मुख्य जलकुंभ अन्थ्राट गावापासून तब्बल दहा किलोमीटर अंतरावर असल्याने भविष्यात या भागात नळपाणी योजनेचे पाणी येण्याची शक्यता फार कमी आहे . सध्या दिडशे घरांची वस्ती असलेल्या अन्थ्राट गावातील महिला कपडे-धुणे, भांडी घासण्यासाठी गावाजवळून वाहणार्‍या नदीवर जातात ती नदी उन्हाळ्यात कोरडी राहत असल्याने पाण्यासाठी डबरे खोदूून ठेवण्यात आले आहेत, तर पिण्याचे पाणी विकत किंवा स्वत:ची बैलगाडी असल्यास त्यावर पिंप ठेवून ते उल्हासनदीवरून आणावे लागत आहे. उल्हासनदी ते गाव हे अंतर पाच किलोमीटर एवढे आहे. काळेवाडी मधील पन्नास घराचे वस्तीसाठी केवळ एक विहीर आहे. विहीरही वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर खोलगट भागात आहे . तेथे जाण्यासाठी आणि तेथून डोक्यावर पाण्याचे हंडे आणतांना आदिवासी महिलांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. सुगवे नळपाणी योजनेत केवळ नामधारी म्हणून राहण्यापेक्षा आम्हाला वेगळी नळपाणी योजना शासनाने तयार करून द्यावी, अशी मागणी या गावातील कार्यकर्ते गोपाळ डायरे यांनी केली आहे . तर या भागातील कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील घोडविंदे यांनी बोरीवली ग्रामपंचायतीच्या सुगवे पाणी योजनेतून पाणी मिळत नसल्याने ग्रामसभेने अन्थ्राट आणि काळेवाडी मुक्त करावी,अशी सूचना केली आहे. (वार्ताहर)