शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

धोकादायक इमारतींच्या यादीत रेल्वे कॉलनी नाही

By admin | Updated: June 1, 2016 03:00 IST

शहरातील सर्वात धोकादायक इमारतींत जुईनगरमधील रेल्वे वसाहतीचा समावेश आहे. वसाहत रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने महापालिका त्या इमारती धोकादायक घोषित करू शकत नाही

नवी मुंबई : शहरातील सर्वात धोकादायक इमारतींत जुईनगरमधील रेल्वे वसाहतीचा समावेश आहे. वसाहत रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने महापालिका त्या इमारती धोकादायक घोषित करू शकत नाही. रेल्वे प्रशासन न्यायालयीन वाद सुरू असल्याचे कारण देत याकडे दुर्लक्ष करीत असून, त्यामुळे रेल्वेचे कर्मचारी व त्यांचा परिवार जीव मुठीत घेऊन जगत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील १८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जुईनगर सेक्टर २२ मधील रेल्वे कॉलनीचा समावेश नाही. रेल्वे वसाहतीमध्ये जवळपास ६० इमारती आहेत. यामधील ३५ इमारतींमध्ये कामगार व अधिकारी परिवारासह वास्तव्य करीत आहेत. अनेक इमारती अर्धवट बांधकाम झालेल्या स्थितीमध्ये आहेत. पूर्णपणे मोडकळीस आल्याने काही इमारती खाली केल्या आहेत. वापर सुरू असलेल्या इमारतींची स्थितीही बिकट आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळून शेकडो नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. यानंतरही महापालिकेने या इमारती धोकादायक घोषित का केल्या नाहीत? रेल्वे वसाहत ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. तेथील नियोजनाचा अधिकारही रेल्वे प्रशासनाचा आहे. यामुळे इमारती धोकादायक घोषित करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. परंतु प्रत्यक्षात रेल्वे प्रशासन या वसाहतीकडे दुर्लक्ष करीत आहे. रेल्वे वसाहत बांधकाम सुरू असल्यापासून वादग्रस्त ठरली आहे. इमारती बांधणाऱ्या ठेकेदाराविषयी झालेल्या मतभेदानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. अनेक इमारतींचे बांधकाम अर्धवट ठेवावे लागले आहे. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने रेल्वे धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करीत नाही. मोडकळीस आलेल्या इमारती पाडतही नाही. किरकोळ दुरुस्ती करून त्यांचा वापर सुरू आहे. पावसाळ्यात ड्युटीवर गेलेल्या कामगारांना घरी जाईपर्यंत आपले कुटुंब सुरक्षित असेल का, याची चिंता सतावत असते. स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व ठाणे जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष निशांत भगत यांनी येथील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु प्रशासन ठोस निर्णय घेत नाही. यामुळे इमारत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवाशी विचारू लागले आहेत.