शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

रायगड जिल्ह्याचे विभाजन नाही

By admin | Updated: August 30, 2015 23:59 IST

जिल्ह्याचे विभाजन करताना नवीन जिल्ह्याला किमान तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात. राज्य सरकारला दैनंदिन खर्च भागविण्यासाठीच महिन्याला तीन हजार कोटी रुपयांचे

अलिबाग : जिल्ह्याचे विभाजन करताना नवीन जिल्ह्याला किमान तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात. राज्य सरकारला दैनंदिन खर्च भागविण्यासाठीच महिन्याला तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागत आहे. या सरकारकडे साधे चहा पिण्यासाठीही पैसे नाहीत. तेच जिल्हा विभाजनाच्या गोष्टी करीत आहेत, अशी खरमरीत टीका अलिबागचे आमदार सुभाष पाटील यांनी केली. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढी लि.ची ५२ वी वार्षिक सभा रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते.सध्या सरकार सुमारे ४२ जिल्ह्याचे विभाजन करणार असल्याचे सांगत आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्याचाही समावेश असून महाड अथवा माणगाव हा नवीन जिल्हा होणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. सरकारचे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. जिल्ह्याचे विभाजन करणे सोपे नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होणार नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.नवीन जिल्ह्याची निर्मिती करताना त्या जिल्ह्याला सोयी-सुविधांसाठी किमान तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात. ४२ जिल्ह्यांचे विभाजन करताना सरकारला अब्जावधी रुपये खर्च करावे लागतील. सध्या सरकारचे एक लाख ३५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. ७५ हजार कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि २० हजार कोटी रुपये निवृत्ती वेतनावर वर्षाला खर्च करावे लागतात. सरकारला महिन्याला तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. कर्जात बुडालेले सरकार एक कप साधा चहाही पिऊ शकत नाहीत, अशी सरकारची परिस्थिती असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे, सचिव राजेंद्र गायकवाड, संचालक प्रकाश म्हात्रे, प्रकाश काळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)