शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

भारतीय संविधानाला कोणताही धोका नाही- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:42 IST

केंद्रातील भाजपा सरकारकडून भारतीय संविधानाला धक्का लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा विरोधकांकडून अप्रचार केला जात आहे;

नवी मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारकडून भारतीय संविधानाला धक्का लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा विरोधकांकडून अप्रचार केला जात आहे; परंतु यात तथ्य नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारतीय संविधानाला अधिक बळकटी मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.रिपाइंच्या दिघा येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीवादी असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोपसुद्धा बिनबुडाचा आहे. कारण मोदी यांनी मागील पाच वर्षांत गोरगरिबांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.इंदू मिलच्या जागेवरील स्मारक, दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचे स्मारक, लंडन येथील घर, बाबासाहेबांची जन्मभूमी महू येथील स्मारकाची निर्मिती केली, तसेच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर केला. त्यामुळे मोदी यांना जातीवादी ठरवणे योग्य नसल्याचे या वेळी आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे माझे विरोधक नाहीत, केवळ समाजाचे ऐक्य महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. रिपाइंचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या वेळी रिपाइंचे कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, अण्णासाहेब रोकडे, नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, यशपाल ओहोळ, युवक अध्यक्ष विजय कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले