शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

कोरोनाविषयी शासनासह मनपाच्या आकड्यांमध्ये दिसते आहे तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:53 IST

लोकप्रतिनिधींची तक्रार : आकडेवारीविषयी संभ्रम दूर करण्याची मागणी

नवी मुंबई : कोरोनाविषयी महानगरपालिका व शासनाच्या आकडेवारीमध्ये फरक असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून आकड्यांचा घोळ मिटवावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रतिदिन कोरोनाविषयी दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करीत असते. यामध्ये रोज वाढलेले रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा याविषयी तपशील दिला जातो. जिल्हा अधिकारी कार्यालयाकडूनही नियमित अहवाल प्रसिद्ध केला जातो. याशिवाय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रतिदिन राज्यातील आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. महानगरपालिका देत असलेले आकडे व शासनाकडील अहवाल यामध्ये तफावत येऊ लागली आहे. माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र देऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.

बुधवारी मनपाने २८७ रुग्ण वाढल्याचे त्यांच्या अहवाल नमूद केले होते. परंतु शासनाच्या अहवालात ५१९ रुग्ण वाढल्याचे नमूद केले होते. शासनाने एकूण रुग्णसंख्या २६,७४९ दिली असून, मनपाने हा आकडा २४,२१४ दिला आहे. दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू झालेल्यांचा आकडा ६०२ असल्याचे शासनाच्या अहवालात नमूद केले आहे. मनपाने मात्र ६ जणांचा मृत्यू झाल्याचे व एकूण मृतांचा आकडा ५५७ असल्याचे नमूद केले आहे. महानगरपालिका व शासनाकडील आकडेवारीमधील फरकामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नक्की कोणाची आकडेवारी खरी असा प्रश्न निर्माण होत आहे. आकडेवारीमधील घोळ लवकरात लवकर दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महानगरपालिका व शासनाकडील आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. मनपाच्या अहवालापेक्षा शासनाकडील अहवालात रुग्णसंख्या व मृतांचा आकडा जास्त असल्याचे निदर्शनास आले असून हा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे. - वैभव गायकवाड, माजी नगरसेवक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका