शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

माथाडी कामगारांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू राहणार, कृती समितीचा निर्धार

By नामदेव मोरे | Updated: February 28, 2024 19:45 IST

शासनाने ही विधेयके मागे घ्यावी अशी मागणी राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी केली आहे.

नवी मुंबई : माथाडी कायदा सुधारणा विधेयक ३४ व २०१८ चे विधेयक ६४ रद्द करण्याच्या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. २९ फेब्रुवारीला चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने घेतला आहे. शासनाने माथाडी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक तयार केले आहे. यामुळे माथाडी कायदाच मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शासनाने ही विधेयके मागे घ्यावी अशी मागणी राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी केली आहे. यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. कृती समितीने २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत मुख्यमंत्री बैठक घेवून माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्ही सरकारला पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटूनही कामगार कायद्यात बदल करण्याच्या विधेयकामुळे कामगार उद्धस्त होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. पण सरकार योग्य संवाद साधत नाही व या प्रश्नावर तोडगाही काढत नाही. यामुळे विधेयक मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देवून पाठिंबा जाहीर केला आहे. २७ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची भेट घडवून आणली होती. त्यांनी २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई