शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

माथाडी कामगारांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू राहणार, कृती समितीचा निर्धार

By नामदेव मोरे | Updated: February 28, 2024 19:45 IST

शासनाने ही विधेयके मागे घ्यावी अशी मागणी राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी केली आहे.

नवी मुंबई : माथाडी कायदा सुधारणा विधेयक ३४ व २०१८ चे विधेयक ६४ रद्द करण्याच्या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. २९ फेब्रुवारीला चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने घेतला आहे. शासनाने माथाडी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक तयार केले आहे. यामुळे माथाडी कायदाच मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शासनाने ही विधेयके मागे घ्यावी अशी मागणी राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी केली आहे. यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. कृती समितीने २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत मुख्यमंत्री बैठक घेवून माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्ही सरकारला पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटूनही कामगार कायद्यात बदल करण्याच्या विधेयकामुळे कामगार उद्धस्त होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. पण सरकार योग्य संवाद साधत नाही व या प्रश्नावर तोडगाही काढत नाही. यामुळे विधेयक मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देवून पाठिंबा जाहीर केला आहे. २७ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची भेट घडवून आणली होती. त्यांनी २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई