शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

विदेशी फळांच्या बाजारपेठेत दहा वर्षांत तिप्पट वाढ

By नामदेव मोरे | Updated: September 30, 2024 09:58 IST

नाशवंत कृषीमालामध्ये फळांचा अग्रक्रमांक असतो. पूर्वी फळे पिकली की एक आठवड्यात त्यांचा वापर होणे आवश्यक असायचे.

- नामदेव मोरेउप-मुख्य उपसंपादकआरोग्यासाठी आहारातील फळांचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले आहे. कोरोनापासूनही आरोग्यविषयी जागरूकता वाढली असून, या सर्वांचा परिणाम फळांच्या मागणीवर झाला आहे. पूर्वी हंगामाप्रमाणे मिळणारी अनेक फळे आता वर्षभर मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागली आहेत. विदेशी फळांनाही मागणी वाढत असून दहा वर्षांत फळांची आयात तिप्पट वाढली आहे. मुंबईपासून खेडेगावापर्यंत प्रत्येक मार्केटमध्ये विदेशी फळेही उपलब्ध होऊ लागली आहेत. 

नाशवंत कृषीमालामध्ये फळांचा अग्रक्रमांक असतो. पूर्वी फळे पिकली की एक आठवड्यात त्यांचा वापर होणे आवश्यक असायचे. यामुळे पूर्वी हंगामाप्रमाणेच फळे मार्केटमध्ये उपलब्ध होत होती. परंतु फळांचे आहारातील महत्त्व लक्षात आल्यामुळे वर्षभर त्याची मागणी वाढली. मागणीप्रमाणे पुरवठा करता यावा यासाठी फळांची शीतगृहात साठवणूक करण्यास सुरुवात झाली. शीतगृहात साठवलेल्या फळांचे आयुष्य दोन महिन्यापर्यंत वाढविणे शक्य होऊ लागले. यामुळे आता वर्षभर ग्राहकांना मुबलक फळे मिळू लागली. मागणी व पुरवठा यांचा मेळ साधण्यासाठी फळांची आयातही सुरू झाली. २००९ मध्ये देशात २८४३ कोटी रुपयांची फळे आयात झाली होती. 

२०१३-१४ मध्ये हा आकडा ७७१५ कोटींवर पोचला. पुढील दहा वर्षांत  यामध्ये तीनपट वाढ झाली असून, २०२३-२४ या वर्षात आयात फळांची उलाढाल २२६६३ वर पोचली आहे. सफरचंद, संत्री, किवी, द्राक्ष,पिअर्स, अवाकडूसह १५ पेक्षा जास्त प्रकारच्या फळांची आयात होत आहे. 

विदेशी फळांविषीय ग्राहकांमध्येही प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्या मार्केटिंगवरही विशेष लक्ष दिले जाते. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू व मलेरियाची साथ प्रचंड वाढते. या काळात शरीरातील कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी किवी व ड्रॅगन फ्रूट उपयुक्त असल्याची मार्केटिंग पद्धतशीरपणे करण्यात आले आहे. यामुळे किवीला मागणी वाढली असून गतवर्षी उलाढाल ४२२ कोटींवर पोचली आहे. किवीप्रमाणेच पपईचाही डेंग्यू, मलेरियाच्या आजारात उपयोग होतो. पण त्याविषयी योग्य मार्केटिंग होत नाही.  विदेशी सफरचंदची उलाढालही ३ हजार कोटींवर पोहोचली आहे. आकर्षक पॅकिंग व विदेशी फळांविषयी आकर्षण यामुळे ग्राहकांकडूनही या फळांना पसंती मिळते. देशातील एकूण आयात फळांमध्ये २० ते २५ टक्के वाटा फक्त मुंबईचा आहे. जेएनपीटी बंदर व हवाई मार्गाने फळे मुंबईत येतात व येथून संपूर्ण राज्यात त्याचे वितरण केले जात आहे. 

फळांची साठवणूक करण्यासाठी नवी मुंबई, तळोजा व इतर राज्याच्या विविध भागांत शीतगृहांची साखळी उपलब्ध आहे. शीतगृहामध्ये साठवणूक केल्यामुळे फळे सडण्याचे प्रमाणही नगण्य झाले आहे. आरोग्यासाठी व रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यामध्ये फळांचा उपयोग होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. डॉक्टरही आजारपणात फळे खाण्याचा सल्ला देत असल्यामुळे देशी फळांबरोबर विदेशी फळांना मागणी वाढत आहे.