शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

विदेशी फळांच्या बाजारपेठेत दहा वर्षांत तिप्पट वाढ

By नामदेव मोरे | Updated: September 30, 2024 09:58 IST

नाशवंत कृषीमालामध्ये फळांचा अग्रक्रमांक असतो. पूर्वी फळे पिकली की एक आठवड्यात त्यांचा वापर होणे आवश्यक असायचे.

- नामदेव मोरेउप-मुख्य उपसंपादकआरोग्यासाठी आहारातील फळांचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले आहे. कोरोनापासूनही आरोग्यविषयी जागरूकता वाढली असून, या सर्वांचा परिणाम फळांच्या मागणीवर झाला आहे. पूर्वी हंगामाप्रमाणे मिळणारी अनेक फळे आता वर्षभर मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागली आहेत. विदेशी फळांनाही मागणी वाढत असून दहा वर्षांत फळांची आयात तिप्पट वाढली आहे. मुंबईपासून खेडेगावापर्यंत प्रत्येक मार्केटमध्ये विदेशी फळेही उपलब्ध होऊ लागली आहेत. 

नाशवंत कृषीमालामध्ये फळांचा अग्रक्रमांक असतो. पूर्वी फळे पिकली की एक आठवड्यात त्यांचा वापर होणे आवश्यक असायचे. यामुळे पूर्वी हंगामाप्रमाणेच फळे मार्केटमध्ये उपलब्ध होत होती. परंतु फळांचे आहारातील महत्त्व लक्षात आल्यामुळे वर्षभर त्याची मागणी वाढली. मागणीप्रमाणे पुरवठा करता यावा यासाठी फळांची शीतगृहात साठवणूक करण्यास सुरुवात झाली. शीतगृहात साठवलेल्या फळांचे आयुष्य दोन महिन्यापर्यंत वाढविणे शक्य होऊ लागले. यामुळे आता वर्षभर ग्राहकांना मुबलक फळे मिळू लागली. मागणी व पुरवठा यांचा मेळ साधण्यासाठी फळांची आयातही सुरू झाली. २००९ मध्ये देशात २८४३ कोटी रुपयांची फळे आयात झाली होती. 

२०१३-१४ मध्ये हा आकडा ७७१५ कोटींवर पोचला. पुढील दहा वर्षांत  यामध्ये तीनपट वाढ झाली असून, २०२३-२४ या वर्षात आयात फळांची उलाढाल २२६६३ वर पोचली आहे. सफरचंद, संत्री, किवी, द्राक्ष,पिअर्स, अवाकडूसह १५ पेक्षा जास्त प्रकारच्या फळांची आयात होत आहे. 

विदेशी फळांविषीय ग्राहकांमध्येही प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्या मार्केटिंगवरही विशेष लक्ष दिले जाते. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू व मलेरियाची साथ प्रचंड वाढते. या काळात शरीरातील कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी किवी व ड्रॅगन फ्रूट उपयुक्त असल्याची मार्केटिंग पद्धतशीरपणे करण्यात आले आहे. यामुळे किवीला मागणी वाढली असून गतवर्षी उलाढाल ४२२ कोटींवर पोचली आहे. किवीप्रमाणेच पपईचाही डेंग्यू, मलेरियाच्या आजारात उपयोग होतो. पण त्याविषयी योग्य मार्केटिंग होत नाही.  विदेशी सफरचंदची उलाढालही ३ हजार कोटींवर पोहोचली आहे. आकर्षक पॅकिंग व विदेशी फळांविषयी आकर्षण यामुळे ग्राहकांकडूनही या फळांना पसंती मिळते. देशातील एकूण आयात फळांमध्ये २० ते २५ टक्के वाटा फक्त मुंबईचा आहे. जेएनपीटी बंदर व हवाई मार्गाने फळे मुंबईत येतात व येथून संपूर्ण राज्यात त्याचे वितरण केले जात आहे. 

फळांची साठवणूक करण्यासाठी नवी मुंबई, तळोजा व इतर राज्याच्या विविध भागांत शीतगृहांची साखळी उपलब्ध आहे. शीतगृहामध्ये साठवणूक केल्यामुळे फळे सडण्याचे प्रमाणही नगण्य झाले आहे. आरोग्यासाठी व रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यामध्ये फळांचा उपयोग होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. डॉक्टरही आजारपणात फळे खाण्याचा सल्ला देत असल्यामुळे देशी फळांबरोबर विदेशी फळांना मागणी वाढत आहे.