शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेतीवरील भार कमी केला पाहिजे, शरद पवार यांचं महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले नागरीकरणासह कारखानदारीमुळे शेतीक्षेत्रात घट

By नामदेव मोरे | Updated: February 11, 2023 14:00 IST

Sharad Pawar: शेतीला अधुनीकतेची जोड देण्याची गरज असून इतर व्यवसायांकडेही वळले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई : नागरीकरण व कारखानदारीमुळे शेतीच्या क्षेत्रात घट होत आहे. शेतीवरील भार कमी केला पाहिजे. शेतीला अधुनीकतेची जोड देण्याची गरज असून इतर व्यवसायांकडेही वळले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या माध्यमातून सानपाडा मध्ये उभारण्यात आलेल्या देशस्थ मराठा भवनच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार बोलत होते. त्यांनी यावेळी मुंबईतील गिरणीकामगार ते कृषी व्यापारातील बदलाचा आढावा घेतला. कृषी व्यापर नवी मुंबईमध्ये स्थलांतर केल्यानंतर त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात व देशात फळ उत्पादन वाढविण्यासाठी सत्तेत असताना प्रयत्न केले. आता फळ उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात विकास कामे करण्यासाठी जमीनी संपादन कराव्या लागत आहेत. शहरीकरण वाढत आहे.कारखानदारी वाढत आहे. यामुळे शेतीसाठीची जमीन कमी होत आहे. देशात ५६ टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. भविष्यात सर्वांनी शेतीत न राहता पर्यायी व्यवसाय उभारावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतीला अधुनीकतेची जोड दिली पाहिजे. शेती व शेती व्यवसायात आहेत, त्यांनी तेथे रहावे पण पुढील पिढीमधील काहींना नवीन क्षेत्रातही पाठविले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मराठा ज्ञाती संस्था हे एक समाजासाठीचे व्यासपीठ आहे. जुन्नर, आंबेगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्राधान्य दिले असून यापुढेही सर्वांना सोबत घेऊन कामे करणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनी बाजारपेठेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार अतूल बेनके यांनीही जुन्नर तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले. संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र नलावडे यांनी संस्थेच्या १८३० पासूनच्या वाटचालीचा व वर्तमान स्थितीचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजन थोरवे, बाळासाहेब दांगट, आशाताई बुचके, अशोक हांडे, शंकर पिंगळे, चंद्रकांत ढोले, भगवान थोरात, महेश मुंढे, नामदेव भगत, बाळासाहेब सोळसकर, संदीप सुतार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेने दिली होती महात्मा ही पदवीमुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेची स्थापना १८३० मध्ये झाली आहे. या संस्थेने जुन्नर, आंबेगाव परिसरातून मुंबईल आलेल्या नागरिकांना आधार दिला. याच संस्थेने महात्मा ज्योतीबा फुले यांना महात्मा ही पदवी दिल्याची आठवणही शरद पवार यांनी सांगितली. गावाकडे व शहरात होणाऱ्या बदलांचाही आढावा घेतला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारagricultureशेतीPoliticsराजकारण