शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षांच्या शेअरगिरीमुळे ठाणोकर वेठीस

By admin | Updated: June 8, 2014 01:16 IST

या महानगरात सध्या 25 हजार रिक्षा असूनही ठाणोकरांना स्वतंत्र रिक्षा मिळणो दुरपास्त झाले आहे.

ठाणो :  या महानगरात सध्या 25 हजार रिक्षा असूनही ठाणोकरांना स्वतंत्र रिक्षा मिळणो दुरपास्त झाले आहे. कारण या पैकी 9क् टक्के रिक्षावाल्यांनी बक्कळ कमाई देणा:या शेअर सिस्टीममध्येच व्यवसाय करण्याचे ठरविल्याने ही स्थिती ओढावली आहे. ठाण्याच्या कोणत्याही भागात स्वतंत्र रिक्षा करायची म्हटली तर अर्धा-अर्धा तास ताटकळत बसावे लागते. 
रात्री तर रेल्वे स्थानकासमोरच भयानक स्थिती असते. 12 वाजेनंतर हाफरिटर्न सुरू होत असल्याने अनेक रिक्षा स्थानकाच्या परिसरात रिक्षांची रांग सुरू होते त्या मर्यादे 
पलिकडे 11.3क् पासून उभ्या राहतात त्या 12 वाजल्यानंतरच रांगेत येतात. परिणामी या अर्धा तासात 
प्रवाशांची रांग एक ते दोन किमी. लांबी ओलांडून जाते. रिक्षावाल्यांची कमाई होते, पण ठाणोकरांचा खोळंबा निष्कारण होतो.
वाहतूक शाखेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तुम्ही मीटरपद्धतीनेच किंवा शेअरपद्धतीनेच व्यवसाय करा, अशी सक्ती कायद्याने करता येत नाही. त्यामुळे येथे आमचा नाईलाज आहे. 
कारण ते भाडे नाकारत नाहीत, भाडे जास्त घेत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्या कारणासाठी प्रतिबंध करणार? मी थकलो होतो, मला विश्रंतीची गरज होती म्हणून मी रिक्षा थांबवली असे तो म्हणून शकतो. (विशेष प्रतिनिधी)
 
च्अमूक काळात रिक्षा चालविलीच पाहिजे असे बंधन कायद्याने कसे घालणार? याचा अर्थ कायद्यानेही त्यांच्या पुढे हात टेकले आहेत. 
च्असाच प्रकार युनियनच्या बाबतीतही आहे तिनेही आपली हताशत: अशाच शब्दांत व्यक्त केली आहे. 
च्म्हणजे काय चालले आहे हे सगळ्यांना माहिती. ते चुकीची आहे हेही सगळ्य़ांना माहिती, परंतु सगळ्य़ांनी गांधारी व्हायचे ठरविले आहे यात मरण बिचा:या ठाणोकरांचे होते. 
 
रिक्षावाल्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सगळेच जण आपल्या पोळीवर जास्तीत जास्त तूप ओढून घेत असतातना रिक्षावाल्यांनीच संत तुकाराम कशासाठी व्हायचे. आम्हीही कमी खर्च आणि श्रमात जर कायदानुसार दोन पैसे जास्त मिळविले तर त्यात चूक काय ? मीटरने केलेला व्यवसाय आणि शेअरने केलेला व्यवसाय यात अडीच ते तीन पटीचा फरक पडतो. शिवाय इंधन आणि कष्ट तसेच वाहनाची ङिाज याच्यात बचत होते ती वेगळीच. ती गृहीत धरली तर हा फरक साडेतीन ते चारपटीत जातो. त्यामुळेच  बहुसंख्य रिक्षावाले शेअर रूटवरच रिक्षा चालविणो पसंत करतात. 
 
हाफ रिटर्नकडे असतो कल
यात मराठी आणि परप्रांतीय अशा सगळ्याच रिक्षाचालकांचा समावेश असल्याने ठाणोकरांची कोंडी झाली आहे. रात्रीच्या वेळी शेअर फारसे मिळत नाही, मग अर्धा तास थांबून हाफ रिटर्नचे प्रवासी घेण्याकडे त्यांचा मोठा कल असतो. यामुळे ठाण्याच्या कोणत्याही परिसरात स्वतंत्र रिक्षा मिळणो अवघड झालेले आहे.