शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवी मुंबई भागवणार पनवेलकरांची तहान, दररोज देणार ५0 टँकर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:38 IST

पनवेल महानगर पालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळेच पनवेल शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगर पालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळेच पनवेल शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. शहरातील या समस्येसंदर्भात शेकाप व मित्रपक्षाने नवी मुंबई पालिकेकडे मदतीचा हात मागितला होता. त्याला प्रतिसाद देत दिवसाला पाण्याचे ५0 टँकर देण्याचे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी मान्य केले आहे.महापालिका क्षेत्रात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेकाप महाआघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची भेट घेतली. यावेळी पनवेलमधील पाण्याच्या समस्येसंदर्भात महापौर सुतार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार पनवेल महापालिकेला दररोज पाण्याचे ५0 टँकर देण्याचे आश्वासन महापौर सुतार यांनी शिष्टमंडळाला दिले. विशेष म्हणजे पनवेल पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने येत्या २0 एप्रिल रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या सभेत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही महापौरांनी महाआघाडीच्या शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले. पनवेलमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मध्यंतरी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील पनवेल शहरातील पाणीप्रश्नासंदर्भात माजी मंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली होती. नवी मुंबई महापालिकेने पनवेल शहराला पाणीपुरवठा करावा, अशी विनंती आयुक्त डॉ. शिंदे यांनी नाईक यांच्याकडे केली होती. त्यानंतर रविवारी पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षाच्या महाआघाडीच्या शिष्टमंडळाने महापौर जयवंत सुतार यांची भेट घेवून पनवेलच्या पाणीटंचाईवर सकारात्मक कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यामुळे पनवेलला मिळणाऱ्या पाण्यावरून येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांत श्रेयवादाचा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या शिष्टमंडळात शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक सतीश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, तालुका अध्यक्ष सुदाम पाटील, गणेश कडू , अशोक शेळके, सुनील घरत आदींचा समावेश होता.पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको, एमजेपीचा पाणीपुरवठा होतो. सिडकोच्या माध्यमातून खारघरला दररोज ७0 एमएलडी पाण्याची गरज असते. त्यापैकी सध्या ६५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. तसेच कळंबोली नोडला प्रतिदिनी ४३ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ३८ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. कामोठे नोडला ३८ एमएलडी पाणी लागते. त्यापैकी ३५ तर नवीन पनवेलला ४२ पैकी ३८ एमएलडी दररोज पाणीपुरवठा केला जातो. पनवेलला ३0 एमएमएलडीपैकी २८ तर ग्रामीण भागात दररोज २0 एमएलडी पाण्याची गरज असताना फक्त १0 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाºया देहरंग धरणाचा पाणीसाठाही कमी होत चालला आहे.नवी मुंबई महापालिका पनवेल महापालिकेला दररोज ५0 टँकर पाणी देणार आहे. परंतु पाण्यासाठी टँकर पनवेल महापालिकेचे असणार आहेत. त्यासाठी लागणारा खर्च पनवेल महापालिकेला उचलावा लागणार आहे.पालिका क्षेत्रात अपुरा पाणी साठा लक्षात घेता पालिका प्रशासनाने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र सत्ताधाºयांनी त्या गोष्टीला विरोध केला. या दरम्यान पाण्याची उपाययोजना झाली नसल्याने आप्पासाहेब वेदक धरणातील पाणी साठा संपुष्टात आला. शेवटी दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पत्र पाणीपुरवठा सभापतींनी आयुक्तांना दिले. मात्र उशीर झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाºया धरणाचा पाणी साठा संपुष्टात आला. आयुक्तांना विरोध म्हणून भाजपाने घेतलेल्या निर्णयामुळे आज शहरवासीयांवर पाण्याचे संकट आले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केला आहे.शेकाप शिष्टमंडळाने आमची भेट घेतली होती. यामध्ये आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील व विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा समावेश होता. पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्याची विनंती त्यांनी केली होती. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी देखील आमच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून माजी मंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेला दररोज पाण्याचे ५0 टँकर देण्याचा निर्णय घेतला आहे.- जयवंत सुतार, महापौर,नवी मुंबई सत्ताधारी भाजपाचे महापौर व आमदार अद्याप धरणाची पाहणी करीत आहेत. ही दिखावेगिरी आहे. शेकाप महाआघाडी सतत शहराला जादा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होते. त्यासाठी माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी दिवसाला ५0 टँकर पाणी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पनवेलमधील पाणीटंचाईतून काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्ष नेते, पनवेल महापालिकानवी मुंबई महापालिकेच्या महापौरांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत आहे. पनवेल महापालिकेला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काळात जलवाहिनीद्वारे नवी मुंबई महापालिकेने पाणीपुरवठा करावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी लवकरच नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची भेट घेतली जाणार आहे.- नीलेश बाविस्कर, सभापती, पाणीपुरवठा समिती, पनवेल महापालिका