शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ठामपाच्या योजना निराधार

By admin | Updated: November 12, 2014 02:16 IST

झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत.

अजित मांडके - ठाणो
झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत. यातील वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेन्ट आणि रिमॉडलींग प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली असली तरी आता जेएनयूआरएम अर्थात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियानच बंद होणार असल्याने, हे प्रकल्प कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
याच योजनेच्या भरवशावर पालिकेने राजीव आवास योजना आणि नाल्यांच्या एकात्मिक विकास प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार कोटींचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले आहेत. परंतु,केंद्राकडून अद्याप यासंदर्भात कोणताही सिग्नल न आल्याने या प्रकल्पांच्या अभ्यासासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
 
वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट 
तत्कालीन महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून ठाण्याच्या खाडीचा विकास (वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट) करण्याची योजना पुढे आली होती. खाडीचा विकास करताना बोटिंग, जलक्रीडा, जलवाहतूक, मॅनग्रोव्ह टेल्स, जॉगिंग ट्रॅक्स, सायकल ट्रॅक्स, मिनी पिकनीक सेंटर आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 
ठाणो शहर, खारेगाव, साकेत, बाळकूम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेती बंदर, मुंब्रा आणि दिवा आदी ठिकाणच्या खाडी किना:याचा या माध्यमातून विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी 125 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांना तत्कालीन केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु सरकार बदलल्यानंतर जेएनएनयूआरएम ही योजनासुध्दा बंद झाली. त्यामुळे आता केंद्राने निधी नसल्याचे कारण पुढे केले आहे.
 
या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे एक हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. तसेच खाडी किनारी एक पंप हाऊस तयार करण्यात येणार आहे. शहरातील सर्व नाले हे खाडी किनारी जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाला आहे.घोडबंदर, मुंब्रा आणि दिवा गावातील पाण्याच्या समस्या सोडविण्याबरोबर येथे सांडपाणी वाहिनी टाकण्याची सुमारे 7क्क् कोटींची योजना आखली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविली होती. 
 
राजीव आवास योजनेचा देखील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. चार टप्प्यांत ती पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार घरे खारटन रोड आणि चेंदणी कोळीवाडा येथे उभारली जाणार आहेत. ज्या प्रभागांत ही योजना तत्काळ पूर्ण होऊ शकते,अशा 1क् प्रभागांचा सव्र्हे पूर्ण झाला आहे. यामध्ये वसंत विहार, कोपरी, सिध्दार्थनगर, म्हाडा कॉलनी, राबोडी आदी भागांचा यात समावेश आहे. याचा अभ्यास करण्यासाठी देखील पालिकेने लाखोंचा निधी खर्च केला आहे. या दोन्ही योजनांबाबत पालिकेने वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. केंद्राने निधी दिला नाही, तर या योजनांचा गाशा गुंडाळावा लागणार आहे.