शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

सहा केंद्रांवर आजपासून होणार दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:38 IST

सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना; नवी मुंबईतील १२७८ विद्यार्थी

 लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी फेरपरीक्षा आज २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. नवी मुंबई शहरातील सुमारे १२७८ विद्यार्थी या परीक्षांना सामोरे जात असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या सावटामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी - बारावीच्या फेरपरीक्षा घेण्यास या वर्षी विलंब झाला आहे. शुक्रवारपासून लेखी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेला शहरातील बारावीचे ८७३ तर दहावीचे ४०५ विद्यार्थी बसले आहेत. बारावीसाठी शहरात तीन तर, दहावीसाठीही तीन परीक्षा केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान मोजण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या अनुषंगाने एका वर्ग खोलीत केवळ १२ परीक्षार्थी याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेची सर्व तयारी झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान अधिक आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याशी चर्चा करण्यात येईल आणि परीक्षा देण्यासाठी त्या विद्यार्थ्याची तयारी असल्यास इतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येईल.- कृष्णकुमार पाटील, अध्यक्ष, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई