शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये तणावपूर्ण शांतता, कडक पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 06:42 IST

बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारांवरही परिणाम झाला होता. दिवसभरामध्ये १३६४ वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला होता. फक्त ४६७ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमध्ये गेला. यामध्ये भाजीपाल्याच्या ३१६ वाहनांचा समावेश होता.

नवी मुंबई - बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारांवरही परिणाम झाला होता. दिवसभरामध्ये १३६४ वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला होता. फक्त ४६७ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमध्ये गेला. यामध्ये भाजीपाल्याच्या ३१६ वाहनांचा समावेश होता. दुपारी मसाला मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती; परंतु पोलीस, माथाडी नेते व आरपीआयच्या नेत्यांनी वेळेत सर्वांना शांत केल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये आली.बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील व्यवहार मध्यरात्री सुरू होत असतात. रात्री १ वाजल्यापासून सूर्याेदयापर्यंत भाजीपाल्याच्या ५७७ वाहनांची आवक झाली होती. यामध्ये ९१ ट्रक व ४८६ टेंपोचा समावेश होता. यामधील फक्त ३१६ वाहनांमधून माल मार्केटबाहेर गेला. ६० टक्के भाजीपाला मार्केटमध्येच पडून होता. फळ मार्केटमध्येही २२६ वाहनांची आवक झाली यापैकी ७० वाहनांमधून माल प्रत्यक्ष विक्रीसाठी बाहेर गेला. कांदा मार्केटमध्ये २४१ वाहनांची आवक व ३२ वाहनांची जावक झाली. मसाला मार्केटमध्ये ९० आवक व फक्त ७ वाहनांची जावक झाली. धान्य मार्केटमध्ये २०३ वाहनांमधून माल आला व त्यापैकी १२ वाहनेच जाऊ शकली. शेतकºयांचा माल खराब होऊ नये, यासाठी आंदोलकांनीही भाजी व फळ मार्केटमधील व्यवहार सुरळीत होऊ दिले; पण ग्राहकांनीच पाठ फिरविल्यामुळे मालाची विक्री होऊ शकली नाही.बाजार समितीमधील व्यवहार ठप्प असले, तरी अनेक गोडाऊनची शटर उघडी असल्यामुळे दुपारी आंदोलकांनी मार्केटमध्ये जाऊन बंद करण्याचे आवाहन केले. बाजार समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमाव हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलीस सहआयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त सुधाकर पठारे व सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे व इतर अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. माथाडी नेते आमदार नरेंद्र पाटील, आरपीआय जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ, युवक अध्यक्ष विजय कांबळे व इतर पदाधिकाºयांनी एपीएमसीमध्ये जाऊन सर्वांना शांत केले. बंद मागे घेतल्यानंतरही एपीएमसी परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नेत्यांचे प्रसंगावधानमसाला मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण होताच माथाडी नेते नरेंद्र पाटील, सी. आर. पाटील, आरपीआय नेते सिद्राम ओहोळ, विजय कांबळे यांनी तत्काळ एपीएमसीमध्ये धाव घेतली. बंद शांततेमध्ये पार पाडण्यासाठी त्यांनी सर्वांना आवाहन केले. सर्वांशी संवाद साधल्यामुळे व प्रसंगावधान दाखवून योग्य निर्णय घेतल्याने काही वेळातच तणाव कमी झाला. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंद