शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

मनोरी खाडीवरील पुलासाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:45 IST

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात : उद्योजक, बिल्डरांनी घेतल्या जमिनी

ठळक मुद्देपूल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारीही वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे.

मीरा रोड / भार्इंदर : मनोरी खाडीवर पूल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली असून त्याचा ग्रामस्थांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. याआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. पण महापालिकेने पुलाच्या कामासाठी निविदा काढल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोनाचा पवित्रा घेतला आहे. मनोरी, गोराई, उत्तन भागात मोठ्या उद्योजकांपासून राजकारणी आणि बिल्डरांनी जमिनी घेतल्या असून त्यांच्या फायद्यासाठी सरकार, पालिका आणि राजकारणी पूल बांधण्याचा घाट सातत्याने घालत आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मुंबई हद्दीतील गोराई व मनोरी खाडीवर पूल बांधण्यास ग्रामस्थांसह विविध संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी सातत्याने गावकरी आंदोलन करत आले आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेने मनोरी खाडीवर पूल बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.या आधी मेरी टाईम बोर्डाने दोन्ही ठिकाणी रो- रो सेवेच्या नावाखाली जेट्टी बांधण्याचे काम मंजूर केले. मनोरी येथील जेट्टीचे काम तर पुलासारखेच असल्याचा आरोप करत ते ग्रामस्थांनी बंद पाडले होते. गोराई येथील जेट्टीचे कामही बंद पाडण्यात आले होते .मुंबई , ठाण्यातील बिल्डर, राजकारणी यांनी शहरीकरणाच्या नावाखाली बक्कळ फायद्यासाठी नामशेष केली आहेत. तर बडे उद्योजक, राजकारणी, बिल्डर आदींनी गेल्या अनेक वर्षांपासून गोराई, मनोरीसह भार्इंदरच्या उत्तन, डोंगरी, चौक, पाली, तारोडी गावाच्या धारावी बेटावरील गावे उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. येथील नैसर्गिक पर्यावरणासह जीवसृष्टीचे सरंक्षण व्हावे, भूमिपुत्रांचे आणि गावांचे अस्तित्व कायम टिकून रहावे, गावची संस्कृती कायम रहावी अशी भूमिका या विरोधामागे धारावी बेट बचावसह अन्य संघटनांनी सातत्याने मांडली आहे.पूल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारीही वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे. अवास्तव बांधकामे फोफावणार आहेत. मूळात या ठिकाणी उद्योजक तसेच राजकारणी, बिल्डर आदींनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या असून त्या विकासासाठी मोकळ्या करण्यासाठी तसेच त्यांच्या फायद्यासाठी सरकार, पालिका आणि राजकारणी सातत्याने पूल बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप समितीचे जोसेफ घोन्सालवीस, संदीप बुरकेन, ल्युड डिसोझा आदींनी केला आहे.ग्रामस्थांच्या मागण्यांकडे सातत्याने डोळेझाकसरकार, राजकारणी केवळ गोराई आणि मनोरी खाडीवर पूल बांधण्याचा सातत्याने उपद्व्याप करत आले आहेत. पण या गावां मध्ये अद्ययावत रु ग्णालय, महाविद्यालय , उद्याने - मैदाने, चांगली परिवहन सेवा आदी सुविधा देण्याची मात्र यांची दानत नाही. गाव परिसरातच स्थानिकांना रोजगार - उद्योगासाठी हे कोणतेही प्रयत्न करत नाहीत. अनेक वर्षांपासून सतत निवेदने - मागण्या करूनही त्या बद्दल हे अवाक्षर काढत नाहीत. परंतु रो - रो सेवा , पूल , पर्यटन आराखडा, एसईझेड आदींची ग्रामस्थांनी मागणी नसतानाही आमच्यावर लादत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई