शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

एका महिन्यात दहा हजार रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 01:20 IST

मृत्युदर शून्यावर आणण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात फक्त अर्धा टक्का कमी करण्यात यश आले असून, दुर्दैर्वाने सर्वाधिक मृत्यू महानगरपालिकेच्याच रुग्णालयात होत आहेत.

नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण झाला. तीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट वाढली आहे. तब्बल दहा हजार रुग्ण वाढले आहेत. ब्रेक द चेन मोहिमेला फारसे यश लाभलेले नाही. मृत्युदर शून्यावर आणण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात फक्त अर्धा टक्का कमी करण्यात यश आले असून, दुर्दैर्वाने सर्वाधिक मृत्यू महानगरपालिकेच्याच रुग्णालयात होत आहेत.नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाच हजार झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. दोनच दिवसांत बदली रद्द करण्यात आली. पुढील २२ दिवसांत रुग्णसंख्या दहा हजारांवर पोहोचली. १४ जुलैला पुन्हा आयुक्तांची बदली करण्यात आली. अभिजीत बांगर यांनी मनपा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पहिल्याच पत्रकार परिषदेत कोरोनाची साखळी खंडित करण्याची व मृत्युदर शून्यावर आणण्याची घोषणा झाली. आयुक्तांनी मिशन ब्रेक द चेन, मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी विशेष मोहीम, झीरो नवी मुंबई मिशन हातात घेतले. चाचण्यांची संख्या वाढविली. एक महिन्यात चाचण्यांची संख्या तीनपट वाढविली आहे. एक महिन्यापूर्वी २७,२४९ जणांच्या चाचण्या झाल्या होत्या. एका महिन्यात हा आकडा ८५ हजारांपेक्षा जास्त झाला आहे, परंतु या एक महिन्यात ही कोरोनाची साखळी खंडित झालेली नाही. रुग्णसंख्या दहा हजारांवरून वीस हजारांपेक्षा जास्त झाली आहे.विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयातील मृत्युदर चिंताजनक आहे.या एक महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० वरून ८० वर पोहोचला, हिच सर्वाधिक दिलासा देणारी गोष्ट आहे.>चाचण्यांसाठीचाविलंब थांबलानवी मुंबईमध्ये एका महिन्यापूर्वी कोरोना चाचणीसाठी खूप वेळ लागत होता. ५ ते १० दिवस रिपोर्टची वाट पाहावी लागत होती.यामुळे उपचार करण्यास विलंब होऊन काही रुग्णांचा मृत्यू होत होता. महानगरपालिकेने स्वत:ची लॅब सुरू केल्यामुळे व अँटिजेन चाचण्या वाढविल्यामुळे चाचणीसाठी लागणारा विलंब टळला आहे.अहवाल लवकर मिळत असल्याने उपचारही लवकर सुरू करता येत आहेत. चाचण्यांची संख्या एका महिन्यात २७ हजारांवरून ८५ हजारांवर पोहोचली आहे.>घोषणांची काटेकोर अंमलबजावणी नाहीमनपा आयुक्तांनी मिशन ब्रेक द चेन, नवी मुंबई झीरो, शून्य मृत्युदर अशा लोकप्रिय घोषणा केल्या, पण याची आधिकाऱ्यांकडून योग्य अंमलबजावणी होत नाही. मृत्युदर फक्त अर्धा टक्का कमी झाला आहे. कोरोनाची साखळी खंडित करता आलेली नाही.>क्वारंटाइन तीन लाखांवरकोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान २० व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. आवश्यक त्यांना क्वारंटाइन केले जात होते. १४ आॅगस्टपर्यंत २ लाख ३३ हजार ७५२ जणांचे क्वारंटाइन पूर्ण झाले असून, जवळपास ६८ हजार जणांचे होम क्वारंटाइन सुरू आहे.