शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

विमानतळबाधित दहा गावांच्या स्थलांतराची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 06:15 IST

अखेरच्या दिवशी मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद : पाच गावे १०० टक्के रिकामी

नवी मुंबई : विमानतळबाधित दहा गावांतील ग्रामस्थांना स्थलांतरासाठी दिलेली अखेरची मुदत मंगळवारी संपली. यानंतर कोणतीही मुदत दिली जाणार नसल्याने त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतराच्या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, शेवटच्या टप्प्यात अर्ज देताना विमानतळबाधितांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडकोचा संबंधित विभाग रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला होता.

दहा गाव संघर्ष समितीच्या विनंतीनुसार ग्रामस्थांना स्थलांतरासाठी १५ जानेवारीची अंतिम मुदत होती. मंगळवारी शेवटच्या टप्प्यात बांधकामे निष्कासित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले.सध्या स्थलांतरित होणाऱ्या दहा गांवापैकी वाघिवलीचा अपवाद वगळता उर्वरित नऊ गावे ९५ टक्के रिकामी झाल्याचा दावा सोमवारी सिडकोकडून करण्यात आला होता. मंगळवारी अखेरच्या दिवशी १०० टक्के स्थलांतर होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून सिडकोच्या संबंधित विभागात प्रकल्पग्रस्तांची गर्दी होती.

शेवटच्या दिवसापर्यंत दहा गावांपैकी गणेशपुरी, तरघर, वाघिवली वाडा व वरचे ओवळे ही पाच गावे एक-दोन प्रकरणांचा अपवाद वगळता १०० टक्के रिकामी झाली आहेत. तर कोल्ही आणि चिंचपाडा ही दोन गावे ९५ टक्के स्थलांतरित झाली आहेत.उलवे आणि कोंबडभुजे या दोन गावांतून ७० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. वाघिवली या गावाचा विमानतळ गाभा क्षेत्राबाहेर समावेश होत असल्याने तूर्तास सिडकोला या गावाच्या स्थलांतराची घाई नाही. असे असले तरी आतापर्यंत या गावातील १५३ कुटुंबांपैकी ९० जणांनी स्थलांतर केले आहे.

अर्जांची दोन दिवसांत पडताळणी करणारबांधकाम निष्कासित करण्यासाठी अंतिम मुदतीच्या आत प्राप्त झालेल्या अर्जाची पुढील दोन दिवसांत संबंधित गावांत जाऊन पडताळणी केली जाईल. बांधकामे निष्कासित केल्याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण अहवाल राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी अर्ज दिले नाहीत; परंतु बांधकामे निष्कासित केली आहेत, त्यांचे त्याच दिवशी अर्ज स्वीकारले जातील, असे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई