शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

तापमान ४२ अंशावर, अंगाची लाही लाही, दोन महिन्यांतला उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:49 IST

रविवारी नवी मुंबईतले तापमान ४२ डिग्री अंशावर पोचले होते. यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या अंगाची लाही लाही झाली.

नवी मुंबई : रविवारी नवी मुंबईतले तापमान ४२ डिग्री अंशावर पोचले होते. यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या अंगाची लाही लाही झाली. मागील दोन महिन्यांतला तापमानाचा हा उच्चांक असून उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात कमालीची वाढ झाली.देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार रविवारी या उष्ण लाटेची झळ नवी मुंबईकरांना चांगलीच बसली. सकाळी ७ वाजल्यापासूनच तापमान ३० अंश डिग्रीच्या आसपास होते. हे तापमान दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ४२ डिग्रीवर पोचले होते. पुढील अडीच तास तापमानाचा हा पारा कायम होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने घराबाहेर निघालेल्यांच्या अंगाची चांगलीच लाही लाही झाली. अनेकांनी उष्णतेच्या लाटेची कल्पना असल्याने दुपारनंतर घराबाहेर निघायचे देखील टाळले. मात्र कामानिमित्ताने घराबाहेर निघालेल्या पादचारी व दुचाकीस्वारांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले. ज्यांना उष्ण लाटेची कल्पना नव्हती, त्यांना तापमानातील अचानक झालेल्या बदलामुळे पुढील दोन महिन्यांतील उन्हाळ्याची कल्पना देखील सहन होत नव्हती. बस थांब्यावरील प्रवासी, सिग्नलला उभे राहणारे दुचाकीस्वार, मोकाट भटके प्राणी या प्रत्येकाकडून उन्हाचे चटके टाळण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार शोधला जात होता.रविवारी झालेली तापमानातील वाढ ही मागील दोन महिन्यांतील सर्वाधिक होती. मागील अनेक दिवसांपासून शहराचे तापमान ३५ ते ३८ डिग्रीपर्यंत जात होते. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल अनेकांना लागलेलीच होती. मात्र तापमान ४२ अंशापर्यंत जाईल याची अपेक्षा नवी मुंबईकरांनी केलेली नव्हती. उष्णतेची ही झळ आठवड्याभरात तीन वेळा नवी मुंबईकरांंना बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारप्रमाणेच मंगळवार व शुक्रवारी देखील देशात अनेक ठिकाणी पुन्हा अशी उष्ण लाट येणार आहे. त्यावेळी देखील नवी मुंबईतील तापमानाचा पारा ४२ डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता आहे. अशावेळी लहान मुलांना घराबाहेर नेण्याचे टाळावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.