शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

तापमान ४२ अंशावर, अंगाची लाही लाही, दोन महिन्यांतला उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:49 IST

रविवारी नवी मुंबईतले तापमान ४२ डिग्री अंशावर पोचले होते. यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या अंगाची लाही लाही झाली.

नवी मुंबई : रविवारी नवी मुंबईतले तापमान ४२ डिग्री अंशावर पोचले होते. यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या अंगाची लाही लाही झाली. मागील दोन महिन्यांतला तापमानाचा हा उच्चांक असून उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात कमालीची वाढ झाली.देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार रविवारी या उष्ण लाटेची झळ नवी मुंबईकरांना चांगलीच बसली. सकाळी ७ वाजल्यापासूनच तापमान ३० अंश डिग्रीच्या आसपास होते. हे तापमान दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ४२ डिग्रीवर पोचले होते. पुढील अडीच तास तापमानाचा हा पारा कायम होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने घराबाहेर निघालेल्यांच्या अंगाची चांगलीच लाही लाही झाली. अनेकांनी उष्णतेच्या लाटेची कल्पना असल्याने दुपारनंतर घराबाहेर निघायचे देखील टाळले. मात्र कामानिमित्ताने घराबाहेर निघालेल्या पादचारी व दुचाकीस्वारांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले. ज्यांना उष्ण लाटेची कल्पना नव्हती, त्यांना तापमानातील अचानक झालेल्या बदलामुळे पुढील दोन महिन्यांतील उन्हाळ्याची कल्पना देखील सहन होत नव्हती. बस थांब्यावरील प्रवासी, सिग्नलला उभे राहणारे दुचाकीस्वार, मोकाट भटके प्राणी या प्रत्येकाकडून उन्हाचे चटके टाळण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार शोधला जात होता.रविवारी झालेली तापमानातील वाढ ही मागील दोन महिन्यांतील सर्वाधिक होती. मागील अनेक दिवसांपासून शहराचे तापमान ३५ ते ३८ डिग्रीपर्यंत जात होते. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल अनेकांना लागलेलीच होती. मात्र तापमान ४२ अंशापर्यंत जाईल याची अपेक्षा नवी मुंबईकरांनी केलेली नव्हती. उष्णतेची ही झळ आठवड्याभरात तीन वेळा नवी मुंबईकरांंना बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारप्रमाणेच मंगळवार व शुक्रवारी देखील देशात अनेक ठिकाणी पुन्हा अशी उष्ण लाट येणार आहे. त्यावेळी देखील नवी मुंबईतील तापमानाचा पारा ४२ डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता आहे. अशावेळी लहान मुलांना घराबाहेर नेण्याचे टाळावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.