शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

जिल्ह्यातील तलाठी कार्यालये बंद

By admin | Updated: November 17, 2016 05:58 IST

तालुक्यातील १८ तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तलाठी कार्यालयेबंदश्रीवर्धन : तालुक्यातील १८ तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले आहे. तालुक्यातील १५ तलाठी व १ मंडळ अधिकारी बुधवार, १६ नोव्हेंबरपासून बेमुदत संपात सामील झाले आहेत. आता जोपर्यंत मंत्रालय पातळीवर तलाठ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत तलाठी सामुदायिक रजेवर राहणार आहेत. आता केंद्र सरकारने ५०० व १ हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे सर्वांनी बँकांमध्ये धाव घेतली आहे. सध्या तलाठ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत खासदार, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार यांना निवेदने दिली. मात्र, एकाही लोकप्रतिनिधीने तलाठ्यांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे त्यांना संपाचे हत्यार उपसावे लागले आहे.तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून काम केले. ७ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. १० नोव्हेंबर रोजी अतिरिक्त कार्यभाराच्या चाव्या तहसीलदारांकडे जमा केल्या. १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आपल्या मागण्या लोकप्रतिनिधींच्या कानावर घातल्या. एवढे करूनही शासनाला जाग येण्यासाठी कामकाज थांबवले, आता तरी शासन मागण्यांचा विचार करेल, अशी अपेक्षा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आहे. ३ नोव्हेंबरपासून आंदोलनाचे टप्पे १४ नोव्हेंबरपर्यंत पार पाडूनही आपल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यामुळे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा इशारा महासंघाने दिला आहे. (वार्ताहर)प्रमुख मागण्याच्तलाठी सजाची व महसूल मंडळाची पुनर्रचना करा, ७/१२ संगणकीकरण व ई- फेरफारमधील अडचणी सोडवा, सर्व्हर स्पीड करा, सॉफ्टवेअरमधील अडचणी दूर करा, लॅपटॉप व प्रिंटर पुरवा, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्या, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळा, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून द्या, मंडळाधिकाऱ्यांना कार्यालयीन भाडे मंजूर करा, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवा आदी विविध मागण्या आहेत अशी माहिती मंडळ अधिकारी बी.टी.बुर्शे यांनी दिली आहे.महाड तालुक्यातील १८५ गावांचे महसुली कामकाज ठप्प दासगाव/महाड : वेळोवेळी शासनाकडे मागण्या करून देखील शासनाने तलाठ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून राज्यातील सर्व तलाठ्यांबरोबर महाड तालुक्यातील १८५ गावांचे ३६ तलाठी तसेच मंडल अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. मात्र संपावर जाण्याअगोदर १० नोव्हेंबर रोजी डीएससी डीवायएस, तसेच कार्यालयाच्या कपाटाला तसेच कार्यालयाला लॉक लावून त्यांच्या चाव्या महाड तहसीलदारंकडे जमा केल्या आहेत. मात्र या संपामुळे पुन्हा नागरिकांना नोटांच्या संकटाबरोबर दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. महाड तालुक्यात ३६ तलाठी सजा आहेत, तसेच ६ मंडल अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहे. अनेक वर्षांपासून तलाठी संघटना शासनाकडे समस्या दूर करण्यासाठी भांडत आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.अलिबागमध्ये तलाठी संपावरअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तलाठी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तलाठ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवहारांना चांगलीच खिळ बसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तलाठ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने आश्वासनांची खैरातच दिली आहे. त्यामुळे बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.तलाठी यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामे थंडावणार आहेत. फेरफार उतारे, वारस नोंद, सात बारा उतारा देणे, त्याची नोंद करणे, मालमत्ता कर यासह अन्य १८ विविध कामे रखडणार आहेत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना होत आहे. तलाठ्यांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या त्रासामध्ये चांगलीच भर पडणार आहे.