शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

जिल्ह्यातील तलाठी कार्यालये बंद

By admin | Updated: November 17, 2016 05:58 IST

तालुक्यातील १८ तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तलाठी कार्यालयेबंदश्रीवर्धन : तालुक्यातील १८ तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले आहे. तालुक्यातील १५ तलाठी व १ मंडळ अधिकारी बुधवार, १६ नोव्हेंबरपासून बेमुदत संपात सामील झाले आहेत. आता जोपर्यंत मंत्रालय पातळीवर तलाठ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत तलाठी सामुदायिक रजेवर राहणार आहेत. आता केंद्र सरकारने ५०० व १ हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे सर्वांनी बँकांमध्ये धाव घेतली आहे. सध्या तलाठ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत खासदार, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार यांना निवेदने दिली. मात्र, एकाही लोकप्रतिनिधीने तलाठ्यांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे त्यांना संपाचे हत्यार उपसावे लागले आहे.तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून काम केले. ७ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. १० नोव्हेंबर रोजी अतिरिक्त कार्यभाराच्या चाव्या तहसीलदारांकडे जमा केल्या. १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आपल्या मागण्या लोकप्रतिनिधींच्या कानावर घातल्या. एवढे करूनही शासनाला जाग येण्यासाठी कामकाज थांबवले, आता तरी शासन मागण्यांचा विचार करेल, अशी अपेक्षा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आहे. ३ नोव्हेंबरपासून आंदोलनाचे टप्पे १४ नोव्हेंबरपर्यंत पार पाडूनही आपल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यामुळे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा इशारा महासंघाने दिला आहे. (वार्ताहर)प्रमुख मागण्याच्तलाठी सजाची व महसूल मंडळाची पुनर्रचना करा, ७/१२ संगणकीकरण व ई- फेरफारमधील अडचणी सोडवा, सर्व्हर स्पीड करा, सॉफ्टवेअरमधील अडचणी दूर करा, लॅपटॉप व प्रिंटर पुरवा, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्या, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळा, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून द्या, मंडळाधिकाऱ्यांना कार्यालयीन भाडे मंजूर करा, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवा आदी विविध मागण्या आहेत अशी माहिती मंडळ अधिकारी बी.टी.बुर्शे यांनी दिली आहे.महाड तालुक्यातील १८५ गावांचे महसुली कामकाज ठप्प दासगाव/महाड : वेळोवेळी शासनाकडे मागण्या करून देखील शासनाने तलाठ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून राज्यातील सर्व तलाठ्यांबरोबर महाड तालुक्यातील १८५ गावांचे ३६ तलाठी तसेच मंडल अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. मात्र संपावर जाण्याअगोदर १० नोव्हेंबर रोजी डीएससी डीवायएस, तसेच कार्यालयाच्या कपाटाला तसेच कार्यालयाला लॉक लावून त्यांच्या चाव्या महाड तहसीलदारंकडे जमा केल्या आहेत. मात्र या संपामुळे पुन्हा नागरिकांना नोटांच्या संकटाबरोबर दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. महाड तालुक्यात ३६ तलाठी सजा आहेत, तसेच ६ मंडल अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहे. अनेक वर्षांपासून तलाठी संघटना शासनाकडे समस्या दूर करण्यासाठी भांडत आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.अलिबागमध्ये तलाठी संपावरअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तलाठी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तलाठ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवहारांना चांगलीच खिळ बसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तलाठ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने आश्वासनांची खैरातच दिली आहे. त्यामुळे बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.तलाठी यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामे थंडावणार आहेत. फेरफार उतारे, वारस नोंद, सात बारा उतारा देणे, त्याची नोंद करणे, मालमत्ता कर यासह अन्य १८ विविध कामे रखडणार आहेत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना होत आहे. तलाठ्यांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या त्रासामध्ये चांगलीच भर पडणार आहे.