शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आधी प्रसाधनगृहे बांधा मगच कारवाई करा...

By admin | Updated: May 7, 2016 00:50 IST

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानानिमित्त महापालिकेने झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण या मोहिमेविषयी

- नामदेव मोरे, नवी मुंबई

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानानिमित्त महापालिकेने झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण या मोहिमेविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रसाधनगृहे उपलब्ध नाहीत, बांधलेली देखभालीअभावी बंद झाली आहेत. उघड्यावर जाण्यास आम्हालाही आवडत नाही, पण मग जायचे कुठे, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. शहरभर जनजागृती फेरी, स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तुर्भे इंदिरानगर, तुर्भे नाका, दिघा व इतर परिसरामध्ये अनेक नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईचे तीव्र पडसाद झोपडपट्टी परिसरात उमटत आहेत. रहिवाशांनी या मोहिमेविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले, आमचा कारवाईला विरोध नाही. पालिकेने नियमाप्रमाणे वागावे. परंतु आमच्या वस्तीमध्ये शौचालयच नसेल तर आम्ही जायचे कुठे हेही सांगितले पाहिजे. पालिकेने शहरात जवळपास ३८९ शौचालये बांधली असून त्यामध्ये ४४६९ सिट्स आहेत. या शौचालयांची देखभाल करण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांवर दिली आहे. परंतु ८० टक्के संस्था व्यवस्थित देखभाल करत नाहीत. सामाजिक संस्थांना दिलेल्या ठेक्याची मुदत संपली आहे. वेळेत या ठेक्यांचे नूतनीकरण केले जात नाही. संस्था व्यवस्थित काम करत आहेत का याची देखभाल करणारी यंत्रणाच नाहीत. अनेक ठिकाणी प्रसाधनगृह बंद आहेत. स्वच्छता होत नसल्याने अनेक ठिकाणी त्यांचा वापर करता येत नाही.महापालिकेने सार्वजनिक शौचालयांमध्ये ५० पैसे शुल्क घेण्याची अट संस्थांना घातली आहे. परंतु अनेक ठिकाणी २ ते ५ रूपये घेतले जात आहेत. २५ रूपयांमध्ये मासिक कौटुंबिक पास देणे आवश्यक आहे. परंतु कुठेच याची अंमलबजावणी केली जात नाही. गत दोन महिन्यांपासून ठाणे-बेलापूर रोडच्या पलीकडील पूर्ण झोपडपट्टीमध्ये आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणी नसल्याचे कारण देवून शौचालये बंद ठेवली जात आहेत. तुर्भे नाका व इंदिरानगरमधील रहिवाशांनी याविषयी संबंधित ठेकेदारांना विचारले असता उद्धट उत्तरे दिली जात आहेत. आम्हाला पालिका पाणी देत नाही मग आम्ही कोठून पाणी आणणार, पाणी मिळाले की शौचालय सुरू केले जाईल. शहरातील बहुतांश शौचालयांची अवस्था बिकट झाली असल्यामुळे नाईलाजाने झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना उघड्यावर जावे लागत आहे. इंदिरानगरमध्ये अतिक्रमण महापालिकेने इंदिरानगरमधील उद्यानामध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह बांधले होते. तिथे रस्ता बांधणाऱ्या ठेकेदाराने अतिक्रमण केले आहे. नागरिकांना तिथे जाण्यापासून रोखले आहे. येथील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी वारंवार तक्रारी करूनही पालिकेने संबंधितांवर काहीच कारवाई केलेली नाही. पालिकेच्या कागदावर प्रसाधनगृह आहेत परंतु प्रत्यक्षात ते वापरण्यायोग्य आहेत का, याकडे दुर्लक्ष होत आहे. पुरस्कार मिळालेच कसे ?महापालिकेला तीन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. दिघा ते बेलापूरपर्यंतच्या झोपडपट्टीमधील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. जी आहेत त्यांची देखभाल होत नाही. निर्मल शहराचे निकष पूर्ण होत नसताना पुरस्कार मिळालेच कसे, असा प्रश्नही नागरिक आता विचारू लागले आहेत.