शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

आधी प्रसाधनगृहे बांधा मगच कारवाई करा...

By admin | Updated: May 7, 2016 00:50 IST

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानानिमित्त महापालिकेने झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण या मोहिमेविषयी

- नामदेव मोरे, नवी मुंबई

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानानिमित्त महापालिकेने झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण या मोहिमेविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रसाधनगृहे उपलब्ध नाहीत, बांधलेली देखभालीअभावी बंद झाली आहेत. उघड्यावर जाण्यास आम्हालाही आवडत नाही, पण मग जायचे कुठे, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. शहरभर जनजागृती फेरी, स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तुर्भे इंदिरानगर, तुर्भे नाका, दिघा व इतर परिसरामध्ये अनेक नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईचे तीव्र पडसाद झोपडपट्टी परिसरात उमटत आहेत. रहिवाशांनी या मोहिमेविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले, आमचा कारवाईला विरोध नाही. पालिकेने नियमाप्रमाणे वागावे. परंतु आमच्या वस्तीमध्ये शौचालयच नसेल तर आम्ही जायचे कुठे हेही सांगितले पाहिजे. पालिकेने शहरात जवळपास ३८९ शौचालये बांधली असून त्यामध्ये ४४६९ सिट्स आहेत. या शौचालयांची देखभाल करण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांवर दिली आहे. परंतु ८० टक्के संस्था व्यवस्थित देखभाल करत नाहीत. सामाजिक संस्थांना दिलेल्या ठेक्याची मुदत संपली आहे. वेळेत या ठेक्यांचे नूतनीकरण केले जात नाही. संस्था व्यवस्थित काम करत आहेत का याची देखभाल करणारी यंत्रणाच नाहीत. अनेक ठिकाणी प्रसाधनगृह बंद आहेत. स्वच्छता होत नसल्याने अनेक ठिकाणी त्यांचा वापर करता येत नाही.महापालिकेने सार्वजनिक शौचालयांमध्ये ५० पैसे शुल्क घेण्याची अट संस्थांना घातली आहे. परंतु अनेक ठिकाणी २ ते ५ रूपये घेतले जात आहेत. २५ रूपयांमध्ये मासिक कौटुंबिक पास देणे आवश्यक आहे. परंतु कुठेच याची अंमलबजावणी केली जात नाही. गत दोन महिन्यांपासून ठाणे-बेलापूर रोडच्या पलीकडील पूर्ण झोपडपट्टीमध्ये आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणी नसल्याचे कारण देवून शौचालये बंद ठेवली जात आहेत. तुर्भे नाका व इंदिरानगरमधील रहिवाशांनी याविषयी संबंधित ठेकेदारांना विचारले असता उद्धट उत्तरे दिली जात आहेत. आम्हाला पालिका पाणी देत नाही मग आम्ही कोठून पाणी आणणार, पाणी मिळाले की शौचालय सुरू केले जाईल. शहरातील बहुतांश शौचालयांची अवस्था बिकट झाली असल्यामुळे नाईलाजाने झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना उघड्यावर जावे लागत आहे. इंदिरानगरमध्ये अतिक्रमण महापालिकेने इंदिरानगरमधील उद्यानामध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह बांधले होते. तिथे रस्ता बांधणाऱ्या ठेकेदाराने अतिक्रमण केले आहे. नागरिकांना तिथे जाण्यापासून रोखले आहे. येथील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी वारंवार तक्रारी करूनही पालिकेने संबंधितांवर काहीच कारवाई केलेली नाही. पालिकेच्या कागदावर प्रसाधनगृह आहेत परंतु प्रत्यक्षात ते वापरण्यायोग्य आहेत का, याकडे दुर्लक्ष होत आहे. पुरस्कार मिळालेच कसे ?महापालिकेला तीन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. दिघा ते बेलापूरपर्यंतच्या झोपडपट्टीमधील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. जी आहेत त्यांची देखभाल होत नाही. निर्मल शहराचे निकष पूर्ण होत नसताना पुरस्कार मिळालेच कसे, असा प्रश्नही नागरिक आता विचारू लागले आहेत.