शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आधी प्रसाधनगृहे बांधा मगच कारवाई करा...

By admin | Updated: May 7, 2016 00:50 IST

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानानिमित्त महापालिकेने झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण या मोहिमेविषयी

- नामदेव मोरे, नवी मुंबई

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानानिमित्त महापालिकेने झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण या मोहिमेविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रसाधनगृहे उपलब्ध नाहीत, बांधलेली देखभालीअभावी बंद झाली आहेत. उघड्यावर जाण्यास आम्हालाही आवडत नाही, पण मग जायचे कुठे, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. शहरभर जनजागृती फेरी, स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तुर्भे इंदिरानगर, तुर्भे नाका, दिघा व इतर परिसरामध्ये अनेक नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईचे तीव्र पडसाद झोपडपट्टी परिसरात उमटत आहेत. रहिवाशांनी या मोहिमेविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले, आमचा कारवाईला विरोध नाही. पालिकेने नियमाप्रमाणे वागावे. परंतु आमच्या वस्तीमध्ये शौचालयच नसेल तर आम्ही जायचे कुठे हेही सांगितले पाहिजे. पालिकेने शहरात जवळपास ३८९ शौचालये बांधली असून त्यामध्ये ४४६९ सिट्स आहेत. या शौचालयांची देखभाल करण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांवर दिली आहे. परंतु ८० टक्के संस्था व्यवस्थित देखभाल करत नाहीत. सामाजिक संस्थांना दिलेल्या ठेक्याची मुदत संपली आहे. वेळेत या ठेक्यांचे नूतनीकरण केले जात नाही. संस्था व्यवस्थित काम करत आहेत का याची देखभाल करणारी यंत्रणाच नाहीत. अनेक ठिकाणी प्रसाधनगृह बंद आहेत. स्वच्छता होत नसल्याने अनेक ठिकाणी त्यांचा वापर करता येत नाही.महापालिकेने सार्वजनिक शौचालयांमध्ये ५० पैसे शुल्क घेण्याची अट संस्थांना घातली आहे. परंतु अनेक ठिकाणी २ ते ५ रूपये घेतले जात आहेत. २५ रूपयांमध्ये मासिक कौटुंबिक पास देणे आवश्यक आहे. परंतु कुठेच याची अंमलबजावणी केली जात नाही. गत दोन महिन्यांपासून ठाणे-बेलापूर रोडच्या पलीकडील पूर्ण झोपडपट्टीमध्ये आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणी नसल्याचे कारण देवून शौचालये बंद ठेवली जात आहेत. तुर्भे नाका व इंदिरानगरमधील रहिवाशांनी याविषयी संबंधित ठेकेदारांना विचारले असता उद्धट उत्तरे दिली जात आहेत. आम्हाला पालिका पाणी देत नाही मग आम्ही कोठून पाणी आणणार, पाणी मिळाले की शौचालय सुरू केले जाईल. शहरातील बहुतांश शौचालयांची अवस्था बिकट झाली असल्यामुळे नाईलाजाने झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना उघड्यावर जावे लागत आहे. इंदिरानगरमध्ये अतिक्रमण महापालिकेने इंदिरानगरमधील उद्यानामध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह बांधले होते. तिथे रस्ता बांधणाऱ्या ठेकेदाराने अतिक्रमण केले आहे. नागरिकांना तिथे जाण्यापासून रोखले आहे. येथील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी वारंवार तक्रारी करूनही पालिकेने संबंधितांवर काहीच कारवाई केलेली नाही. पालिकेच्या कागदावर प्रसाधनगृह आहेत परंतु प्रत्यक्षात ते वापरण्यायोग्य आहेत का, याकडे दुर्लक्ष होत आहे. पुरस्कार मिळालेच कसे ?महापालिकेला तीन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. दिघा ते बेलापूरपर्यंतच्या झोपडपट्टीमधील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. जी आहेत त्यांची देखभाल होत नाही. निर्मल शहराचे निकष पूर्ण होत नसताना पुरस्कार मिळालेच कसे, असा प्रश्नही नागरिक आता विचारू लागले आहेत.