शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चिंचपाडापासून सर्वेक्षण; २१ सप्टेंबरला होणार सुरूवात

By नामदेव मोरे | Updated: September 18, 2023 19:16 IST

एसआरएच्या माध्यमातून कागदपत्रांची होणार पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईमधील झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी शासनाने एसआरए योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील झोपडपट्टीवासीयांचे सर्वेक्षण चिंचपाडापासून करण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरला सर्वेक्षण सुरू केले जाणार असून एसआरए चे कर्मचारी कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत.

          नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान एमआयडीसीत व डोंगराच्या पायथ्याशी झोपडपट्टी परिसर आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांना पक्की घरे मिळावीत यासाठी एसआरए योजना राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला शासनाने मंजूरी दिली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. महानगरपालिका क्षेत्रामधील झोपड्यांचे व रहिवाशांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ऐरोली विभागामधील चिंचपाडा झोपडपट्टीपासून २१ सप्टेंबरला हे सर्वेक्षण सुरू होणार आहे. जानेवारी २००० किंवा त्यापुर्वीपासून संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्यासाठी व प्रत्यक्षात राहणाऱ्या झोपडीवासीयांचा निवारा निश्चीत करण्याचे काम केले जाणार आहे. सर्वेक्षण पथकाकडून झोपडी क्रमांक देण्यात आलेल्या झोपड्यांचे मोजमाप, झोपडीधारकांच्या घरोघरी जाऊन संबंधित कुटुंबप्रमुख यांचे बायोमेट्रीक टेक्नोलॉजीद्वारे अंगठ्याचा ठसा व फोटो व झोपडीसमोर झोपडीधारकांच्या कुटुंबाचे फोटो घेण्यात येणार आहेत. रहिवशांकडून वास्तव्याचे पुरावे संकलीत केले जाणार आहेत. हे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत केले जात असून त्यास सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे १ च्या माध्यमातून केले आहे.

मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईमधील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे मिळावी अशी रहिवाशांची मागणी होती. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल शासनाने घेतली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सर्वे झोपडपट्टी परिसराचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

नवी मुंबईमधील झोपडपट्टी क्षेत्रामध्ये प्रथमच चिंचपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. यासाठी सर्व रहिवाशांच्यावतीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभारी आहोत- विजय चौगुले - शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई