शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चिंचपाडापासून सर्वेक्षण; २१ सप्टेंबरला होणार सुरूवात

By नामदेव मोरे | Updated: September 18, 2023 19:16 IST

एसआरएच्या माध्यमातून कागदपत्रांची होणार पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईमधील झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी शासनाने एसआरए योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील झोपडपट्टीवासीयांचे सर्वेक्षण चिंचपाडापासून करण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरला सर्वेक्षण सुरू केले जाणार असून एसआरए चे कर्मचारी कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत.

          नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान एमआयडीसीत व डोंगराच्या पायथ्याशी झोपडपट्टी परिसर आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांना पक्की घरे मिळावीत यासाठी एसआरए योजना राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला शासनाने मंजूरी दिली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. महानगरपालिका क्षेत्रामधील झोपड्यांचे व रहिवाशांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ऐरोली विभागामधील चिंचपाडा झोपडपट्टीपासून २१ सप्टेंबरला हे सर्वेक्षण सुरू होणार आहे. जानेवारी २००० किंवा त्यापुर्वीपासून संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्यासाठी व प्रत्यक्षात राहणाऱ्या झोपडीवासीयांचा निवारा निश्चीत करण्याचे काम केले जाणार आहे. सर्वेक्षण पथकाकडून झोपडी क्रमांक देण्यात आलेल्या झोपड्यांचे मोजमाप, झोपडीधारकांच्या घरोघरी जाऊन संबंधित कुटुंबप्रमुख यांचे बायोमेट्रीक टेक्नोलॉजीद्वारे अंगठ्याचा ठसा व फोटो व झोपडीसमोर झोपडीधारकांच्या कुटुंबाचे फोटो घेण्यात येणार आहेत. रहिवशांकडून वास्तव्याचे पुरावे संकलीत केले जाणार आहेत. हे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत केले जात असून त्यास सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे १ च्या माध्यमातून केले आहे.

मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईमधील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे मिळावी अशी रहिवाशांची मागणी होती. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल शासनाने घेतली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सर्वे झोपडपट्टी परिसराचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

नवी मुंबईमधील झोपडपट्टी क्षेत्रामध्ये प्रथमच चिंचपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. यासाठी सर्व रहिवाशांच्यावतीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभारी आहोत- विजय चौगुले - शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई