शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: March 5, 2016 02:11 IST

अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अलिबाग : अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोरही गळून गेल्याने बागायतदार चांगलेच हवालदिल झाले आहेत. वीटभट्ट्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने वीटभट्टी मालक मेटाकुटीला आले आहेत. अवकाळी पावसाने सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि काही अवधीतच तुफान पावसाला सुरुवात झाली.पावसामुळे शेतामध्ये सध्या पालेभाज्या, तोंडली, कारली, पांढरा कांदा, चवळी, मुगाचे पीक जोरात आहे. परंतु पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे त्यांच्या प्रतिवर फरक पडणार असल्याने बाजारात अपेक्षेप्रमाणे किंमत आता मिळणार नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे कावीर येथील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले. रायगड बाजार परिसरात झाड पडल्याने काहीकाळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. (प्रतिनिधी)माथेरान : सकाळपासूनच सोसाट्याचा वारा वाहू लागला. दुपारी १२ वाजता रिमझिम पावसाने सुरु वात केल्याने हवेतील उष्मा काहीशा प्रमाणात कमी झाला, परंतु वाऱ्याने येथील कापडिया मार्केटजवळील गणेश कदम यांच्या घराजवळ असलेल्या झाडाची मोठी फांदी त्यांच्या घरालगत पडली. सुदैवाने यामध्ये काही हानी झाली नसली तरी हे झाड अतिवृष्टीत केव्हाही कोसळून वित्तहानी अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जंजिरा : अवकाळी पावसाने शुक्रवारी सर्वत्र गोंधळ उडाला. जोरदार पाऊस व वादळी वारे यामुळे बागायतींची मोठी हानी झाली. शहरातील दरबार रोडवर एका घराच्या गच्चीवर उंच नारळाचे झाड कोसळले. संपूर्ण कठडा तोडून झाड टेरेसवर कोसळले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गुरुवारी रात्रभर सोसाट्याचा वारा सुरू होता. अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलवली आणि उसर येथील पाच घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांचे छप्पर उडून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. जगदीश ठाकूर, प्रमोद मयेकर, सिताराम घरत, सुरेश घरत सर्व रा. खानाव-वेलवली रमाकांत शिंदे (रा. उसर ) यांच्या घरांचे छप्पर उडून प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती खानावचे सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी दिली. १कार्लेखिंड : अवकाळी पावसाने शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेला वारा आणि पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो शेतकरी बांधवांना. कार्लेखिंड विभागात अर्धा तास जोरदार पाऊस पडला. यामुळे आंबा फळाची गळती होऊ शकते, बागायतदार चिंतेत आहेत.