शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: March 5, 2016 02:11 IST

अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अलिबाग : अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोरही गळून गेल्याने बागायतदार चांगलेच हवालदिल झाले आहेत. वीटभट्ट्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने वीटभट्टी मालक मेटाकुटीला आले आहेत. अवकाळी पावसाने सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि काही अवधीतच तुफान पावसाला सुरुवात झाली.पावसामुळे शेतामध्ये सध्या पालेभाज्या, तोंडली, कारली, पांढरा कांदा, चवळी, मुगाचे पीक जोरात आहे. परंतु पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे त्यांच्या प्रतिवर फरक पडणार असल्याने बाजारात अपेक्षेप्रमाणे किंमत आता मिळणार नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे कावीर येथील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले. रायगड बाजार परिसरात झाड पडल्याने काहीकाळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. (प्रतिनिधी)माथेरान : सकाळपासूनच सोसाट्याचा वारा वाहू लागला. दुपारी १२ वाजता रिमझिम पावसाने सुरु वात केल्याने हवेतील उष्मा काहीशा प्रमाणात कमी झाला, परंतु वाऱ्याने येथील कापडिया मार्केटजवळील गणेश कदम यांच्या घराजवळ असलेल्या झाडाची मोठी फांदी त्यांच्या घरालगत पडली. सुदैवाने यामध्ये काही हानी झाली नसली तरी हे झाड अतिवृष्टीत केव्हाही कोसळून वित्तहानी अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जंजिरा : अवकाळी पावसाने शुक्रवारी सर्वत्र गोंधळ उडाला. जोरदार पाऊस व वादळी वारे यामुळे बागायतींची मोठी हानी झाली. शहरातील दरबार रोडवर एका घराच्या गच्चीवर उंच नारळाचे झाड कोसळले. संपूर्ण कठडा तोडून झाड टेरेसवर कोसळले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गुरुवारी रात्रभर सोसाट्याचा वारा सुरू होता. अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलवली आणि उसर येथील पाच घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांचे छप्पर उडून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. जगदीश ठाकूर, प्रमोद मयेकर, सिताराम घरत, सुरेश घरत सर्व रा. खानाव-वेलवली रमाकांत शिंदे (रा. उसर ) यांच्या घरांचे छप्पर उडून प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती खानावचे सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी दिली. १कार्लेखिंड : अवकाळी पावसाने शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेला वारा आणि पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो शेतकरी बांधवांना. कार्लेखिंड विभागात अर्धा तास जोरदार पाऊस पडला. यामुळे आंबा फळाची गळती होऊ शकते, बागायतदार चिंतेत आहेत.