शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: March 5, 2016 02:11 IST

अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अलिबाग : अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोरही गळून गेल्याने बागायतदार चांगलेच हवालदिल झाले आहेत. वीटभट्ट्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने वीटभट्टी मालक मेटाकुटीला आले आहेत. अवकाळी पावसाने सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि काही अवधीतच तुफान पावसाला सुरुवात झाली.पावसामुळे शेतामध्ये सध्या पालेभाज्या, तोंडली, कारली, पांढरा कांदा, चवळी, मुगाचे पीक जोरात आहे. परंतु पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे त्यांच्या प्रतिवर फरक पडणार असल्याने बाजारात अपेक्षेप्रमाणे किंमत आता मिळणार नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे कावीर येथील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले. रायगड बाजार परिसरात झाड पडल्याने काहीकाळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. (प्रतिनिधी)माथेरान : सकाळपासूनच सोसाट्याचा वारा वाहू लागला. दुपारी १२ वाजता रिमझिम पावसाने सुरु वात केल्याने हवेतील उष्मा काहीशा प्रमाणात कमी झाला, परंतु वाऱ्याने येथील कापडिया मार्केटजवळील गणेश कदम यांच्या घराजवळ असलेल्या झाडाची मोठी फांदी त्यांच्या घरालगत पडली. सुदैवाने यामध्ये काही हानी झाली नसली तरी हे झाड अतिवृष्टीत केव्हाही कोसळून वित्तहानी अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जंजिरा : अवकाळी पावसाने शुक्रवारी सर्वत्र गोंधळ उडाला. जोरदार पाऊस व वादळी वारे यामुळे बागायतींची मोठी हानी झाली. शहरातील दरबार रोडवर एका घराच्या गच्चीवर उंच नारळाचे झाड कोसळले. संपूर्ण कठडा तोडून झाड टेरेसवर कोसळले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गुरुवारी रात्रभर सोसाट्याचा वारा सुरू होता. अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलवली आणि उसर येथील पाच घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांचे छप्पर उडून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. जगदीश ठाकूर, प्रमोद मयेकर, सिताराम घरत, सुरेश घरत सर्व रा. खानाव-वेलवली रमाकांत शिंदे (रा. उसर ) यांच्या घरांचे छप्पर उडून प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती खानावचे सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी दिली. १कार्लेखिंड : अवकाळी पावसाने शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेला वारा आणि पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो शेतकरी बांधवांना. कार्लेखिंड विभागात अर्धा तास जोरदार पाऊस पडला. यामुळे आंबा फळाची गळती होऊ शकते, बागायतदार चिंतेत आहेत.