शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

संचारबंदीमुळे सलग पाच दिवस रुग्णवाढ रोखण्यात यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:32 IST

रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली : निर्बंधांमुळे साखळी होते आहे खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्य शासनाने लागू केलेली संचारबंदी व कडक निर्बंध यामुळे नवी मुंंबईमध्ये कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. सलग पाच दिवस रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ११,०४५ वरून १०,३३७ वर आली आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. महानगरपालिका प्रशासनाने शहरात संचारबंदी व कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दहा दिवसांपूर्वी एकाच दिवशी १४०० रुग्ण वाढू लागले होते; परंतु मागील पाच दिवसांमध्ये सातत्याने नवीन रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. १५ एप्रिलला १०३६ रुग्ण वाढले होते व १४६५ जण बरे झाले होते. सोमवारी ७५६ नवीन रुग्ण वाढले होते व ९४३ जण बरे झाले होते. पाच दिवसांमध्ये ४६२३ नवीन रुग्ण वाढले व ६०२५ जण बरे झाले आहेत.

महानगरपालिकेला कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळून इतर दुकाने बंद ठेवल्यामुळे रोडवरील अनावश्यक गर्दी कमी होऊ लागली आहे. गर्दी करणाऱ्यांवर कारवाई होऊ लागली आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे. नियमांचे पालन केले तर कोरोनाची साखळी खंडित करणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मृत्यूचा आकडा वाढतोयमागील पाच दिवसांमध्ये नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले व कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे; परंतु दुसरीकडे मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे चिंताही वाढू लागली आहे. पाच दिवसांत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिदिन सरासरी ८ जणांचा मृत्यू होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या