शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 23:41 IST

सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरु स्तीनंतर देखील या भुयारी मार्गांचा गैरवापर होत असल्याने तसेच विविध समस्या उद्भवत असल्याने नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळला होता. अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असून, महामार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. महामार्ग ओलांडताना अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत, त्यामुळे महामार्गाचे रुं दीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविले होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते.अनेक वर्षे पडीक पडल्याने भुयारी मार्गांत सांडपाणी आणि कचरा साचला होता, त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. तसेच हे भुयारी मार्ग गर्दुल्ल्यांचा अड्डादेखील बनला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू केले होते.चारही भुयारी मार्गांची सुधारणा करण्याच्या कामासाठी महापालिकेने तब्ब्ल ४३ लाख रु पयांचा खर्च केला होता. दुरु स्तीनंतर देखील भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून, मद्यपी आणि जुगार खेळणाऱ्यांनी अड्डा बनविला होता, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा झाल्याने नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर करणे टाळले होते. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाखो रु पये खर्च करूनही भुयारी मार्गाच्या अडचणी न सुटल्याने अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.>महामार्गावरील भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणीसायन पनवेल महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. मार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी नेरूळ परिसरात लाखो रुपये खूर्चन नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चार भुयारी मार्ग बांधण्यात आले. मात्र सध्या ते बंदावस्थेत आहेत. भुयारी मार्गाचे अपूर्णावस्थेतील काम पूर्ण करून ते लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.