शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
3
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
4
भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
5
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
6
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
7
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
8
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
9
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
10
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
11
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
12
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
13
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
15
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
16
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
17
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
18
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
19
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
20
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 23:41 IST

सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरु स्तीनंतर देखील या भुयारी मार्गांचा गैरवापर होत असल्याने तसेच विविध समस्या उद्भवत असल्याने नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळला होता. अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असून, महामार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. महामार्ग ओलांडताना अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत, त्यामुळे महामार्गाचे रुं दीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविले होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते.अनेक वर्षे पडीक पडल्याने भुयारी मार्गांत सांडपाणी आणि कचरा साचला होता, त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. तसेच हे भुयारी मार्ग गर्दुल्ल्यांचा अड्डादेखील बनला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू केले होते.चारही भुयारी मार्गांची सुधारणा करण्याच्या कामासाठी महापालिकेने तब्ब्ल ४३ लाख रु पयांचा खर्च केला होता. दुरु स्तीनंतर देखील भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून, मद्यपी आणि जुगार खेळणाऱ्यांनी अड्डा बनविला होता, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा झाल्याने नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर करणे टाळले होते. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाखो रु पये खर्च करूनही भुयारी मार्गाच्या अडचणी न सुटल्याने अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.>महामार्गावरील भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणीसायन पनवेल महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. मार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी नेरूळ परिसरात लाखो रुपये खूर्चन नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चार भुयारी मार्ग बांधण्यात आले. मात्र सध्या ते बंदावस्थेत आहेत. भुयारी मार्गाचे अपूर्णावस्थेतील काम पूर्ण करून ते लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.