शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

एमपीएससी परीक्षेसाठी संधीचे बंधन असल्याने विद्यार्थी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:48 IST

उमेदवारांसाठी संधीची कमाल मर्यादा निश्चित; काहींनी केले निर्णयाचे स्वागत

योगेश पिंगळे

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची मर्यादा नक्की केली आहे. संधीची संख्या कमी झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. संधी कमी झाल्याने, या ठरावीक संधींचे सोने करण्याची वेळ असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. 

यापूर्वी अनेक विद्यार्थी नोकरी मिळाल्यानंतरही वयाची अट संपेपर्यंत परीक्षा द्यायचे. मात्र, आयोगाने बंधन आणल्याने विद्यार्थ्यांना सहा, मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नऊ संधीचे बंधन घातले आहे. मुलींना देण्यात येणाऱ्या संधींमध्ये वाहद करण्यात यावीत, तसेच मुलींसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचीही सुविधा असावी, असे मत परीक्षार्थी मुलींनी यक्त केले आहे. नेरुळमधील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा येथील ग्रंथालयात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, काहींनी या  निर्णयाचे  स्वागत केले आहे.

अशा प्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

मुलींच्या संधीमध्ये वाढ करावीअनेक मुलींना शिक्षणाची आवड असते, परंतु ठरावीक वयानंतर त्यांच्या लग्नाचा विचार केला जातो. लग्नानंतर त्यातील काही मुलींना शिक्षणाची संधी मिळते, परंतु संधीच्या बंधनामुळे त्या मुलींचे स्वप्न अर्धवट राहण्याची शक्यता आहे. मुलींना देण्यात येणाऱ्या संधीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.                                                     - निलू पांडे , उमेदवार

दुसरा मार्ग अवलंबता येईलहा निर्णय विद्यार्थ्यांनी सकारात्मक घेतला, तर योग्यच आहे. यामुळे जोपर्यंत विद्यार्थ्यांची तयारी होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी परीक्षेला बसणार नाहीत किंवा त्यांना योग्य वयातच दुसरा काही मार्ग अवलंबता येऊ शकतो.    - सुशांत कोळेकर, उमेदवार

वेळ वाया जाणार नाहीपरीक्षेला संधींची मर्यादा असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे, असेच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही आणि त्यांना करिअरसंदर्भात वेळीच योग्य निर्णय घेता येईल.    - आकाश शिंदे, उमेदवार

निर्णय अतिशय योग्य संधीचे सर्वांना समान बंधन असायला पाहिजे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर भविष्य घडवायचे आहे, ते त्या वेळेत सीरियसली अभ्यास करतील, त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. त्याचा फायदा विद्यार्र्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे.                                            - तुषार येचकर , उमेदवार

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMPSC examएमपीएससी परीक्षा