शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षेसाठी संधीचे बंधन असल्याने विद्यार्थी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:48 IST

उमेदवारांसाठी संधीची कमाल मर्यादा निश्चित; काहींनी केले निर्णयाचे स्वागत

योगेश पिंगळे

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची मर्यादा नक्की केली आहे. संधीची संख्या कमी झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. संधी कमी झाल्याने, या ठरावीक संधींचे सोने करण्याची वेळ असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. 

यापूर्वी अनेक विद्यार्थी नोकरी मिळाल्यानंतरही वयाची अट संपेपर्यंत परीक्षा द्यायचे. मात्र, आयोगाने बंधन आणल्याने विद्यार्थ्यांना सहा, मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नऊ संधीचे बंधन घातले आहे. मुलींना देण्यात येणाऱ्या संधींमध्ये वाहद करण्यात यावीत, तसेच मुलींसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचीही सुविधा असावी, असे मत परीक्षार्थी मुलींनी यक्त केले आहे. नेरुळमधील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा येथील ग्रंथालयात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, काहींनी या  निर्णयाचे  स्वागत केले आहे.

अशा प्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

मुलींच्या संधीमध्ये वाढ करावीअनेक मुलींना शिक्षणाची आवड असते, परंतु ठरावीक वयानंतर त्यांच्या लग्नाचा विचार केला जातो. लग्नानंतर त्यातील काही मुलींना शिक्षणाची संधी मिळते, परंतु संधीच्या बंधनामुळे त्या मुलींचे स्वप्न अर्धवट राहण्याची शक्यता आहे. मुलींना देण्यात येणाऱ्या संधीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.                                                     - निलू पांडे , उमेदवार

दुसरा मार्ग अवलंबता येईलहा निर्णय विद्यार्थ्यांनी सकारात्मक घेतला, तर योग्यच आहे. यामुळे जोपर्यंत विद्यार्थ्यांची तयारी होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी परीक्षेला बसणार नाहीत किंवा त्यांना योग्य वयातच दुसरा काही मार्ग अवलंबता येऊ शकतो.    - सुशांत कोळेकर, उमेदवार

वेळ वाया जाणार नाहीपरीक्षेला संधींची मर्यादा असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे, असेच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही आणि त्यांना करिअरसंदर्भात वेळीच योग्य निर्णय घेता येईल.    - आकाश शिंदे, उमेदवार

निर्णय अतिशय योग्य संधीचे सर्वांना समान बंधन असायला पाहिजे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर भविष्य घडवायचे आहे, ते त्या वेळेत सीरियसली अभ्यास करतील, त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. त्याचा फायदा विद्यार्र्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे.                                            - तुषार येचकर , उमेदवार

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMPSC examएमपीएससी परीक्षा