शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धिक क्षमता पाहून विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:15 IST

विजय नाहटा : करिअर मार्गदर्शन शिबिराला उत्साही प्रतिसाद

नवी मुंबई : उज्ज्वल भवितव्यासाठी दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना कोणते शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, नोकरीच्या माध्यमातून देशसेवा कशी करता येते याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या करिअर मार्गदर्शन शिबिरात शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता पाहून करिअरची निवड करण्याचा सल्ला नाहटा यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिबिराच्या माध्यमातून करिअरविषयी असलेले संभ्रम दूर होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा उत्साही प्रतिसाद या शिबिराला लाभला.

नवी मुंबई शहरात सुमारे ९0 टक्क्याहून अधिक नागरिक सुशिक्षित आहेत. जीवन जगताना आर्थिक नियोजनासाठी निवडलेल्या मार्गांना करिअर म्हटले जाते. दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे नेमके कोणते शिक्षण घ्यावे, चांगल्या व्यवसायासाठी कोणते क्षेत्र निवडवावे याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो. या वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांना करिअर घडविताना मोठा आधार मिळतो.

शहरातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी हजारो रु पये खर्च करणे शक्य नाही यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी २८ मे ते १ जून या कालावधीत सीबीडी, नेरु ळ पूर्व आणि पश्चिम, सानपाडा आदी ठिकाणी करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये नाहटा आणि विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, आवड, बौद्धिक, शारीरिक क्षमता आणि सामाजिक गरजा यांचा विचार करून करिअरची निवड करण्याचे आवाहन नाहटा यांनी विद्यार्थ्यांना केले.

सध्या व्यवसाय निवडीचे देखील हजारो मार्ग उपलब्ध असून त्याबाबत कोणतेही बंधन नसल्याचे त्यांनी सांगितले. आवड आणि कल ओळखण्याच्या अनेक चाचण्या देखील उपलब्ध असून त्यांचा वापर करून आवड निश्चित करण्याचा सल्ला नाहटा यांनी दिला. सामाजिक गरज देखील महत्त्वाची असून व्यवसाय निवड करताना याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रातील नोकऱ्या आणि व्यवसाय याबाबत विविध पर्यायांची माहिती देखील यावेळी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने फाउंडेशनच्या माध्यमातून माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली.