शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

नेरळ गावातील विद्यार्थी दाटीवाटीत घेताहेत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 01:21 IST

कुंभारआळी शाळेची इमारत पाडून तीन वर्षे पूर्ण

कांता हाबळे 

नेरळ : नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या कुंभारआळी भागातील शाळेच्या इमारती नवीन इमारत बांधण्यासाठी पाडण्यात आल्या आहेत. मात्र, त्या गोष्टीला तीन वर्षे पूर्ण झाली असून अद्याप त्या वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. दरम्यान, इमारत उपलब्ध नसल्याने त्या शाळेचे विद्यार्थी एकाच इमारतीमध्ये दाटीवाटीने बसून शिक्षण घेत आहेत.

नेरळ गावातील कुंभारआळी येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तीन इमारती त्या ठिकाणी होत्या. त्या कौलारू इमारतीमध्ये पाच वर्ग आणि षट्कोनी इमारतीमध्ये एक, असे वर्ग त्या शाळेत भरविले जात होते. त्या सर्व इमारती २०१६ मध्ये जिल्हा परिषदेने पाडल्या असून, त्या जागी नवीन इमारती उभ्या करण्याची कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही.ज्या वेळी इमारती पाडण्यात आल्या, त्या वेळी त्या ठिकाणी १२ वर्गखोल्या बांधण्यात येणार होत्या. मात्र, त्या वर्गखोल्यांना मंजुरी होती का? जिल्हा परिषदेच्या परवानगीने इमारती पाडण्यात आल्या होत्या का? याबाबत उपोषणदेखील झाले होते आणि जिल्हा परिषदेने एक समिती गठीत केली होती. त्या समितीचे काय झाले आणि परवानगीचे काय झाले, याबाबत नेरळ ग्रामस्थांना काहीही देणे घेणे नाही. फक्त नेरळ ग्रामस्थांना शाळेची इमारत पाहिजे, अशी भूमिका नेरळचे उपसरपंच अंकुश शेळके यांनी घेतली होती. मात्र, आजतागत नेरळ कुंभारआळी भागातील शाळेची इमारत उभी राहू शकली नाही.मात्र, इमारत तोडून तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी नवीन इमारतीचे कोणत्याही प्रकारचे बांधकाम जिल्हा परिषदेकडून करण्यात आले नाही. त्यामुळे नेरळ गावातील कुंभारआळी शाळेत जाणारे विद्यार्थी हे बाजूच्या शाळेत दाटीवाटीने बसत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करून त्या इमारतीत कुंभारआळी शाळेतील विद्यार्थी बसत आहेत. तर २०१६ मध्ये पाडण्यात आलेल्या तीन इमारतींतील काही वर्गखोल्यात अंगणवाड्या भरवल्या जायच्या. त्या अंगणवाड्या सध्या शिवाजी महाराज मैदानात भरवल्या जात आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन वर्गखोल्या बांधण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेकडून होण्याची आवश्यकता आहे; परंतु गेल्या तीन वर्षात भूमिपूजन झालेल्या इमारतीचे बांधकाम अद्याप होऊ शकले नाही, याचे आश्चर्य नेरळकरांना वाटत आहे. त्यामुळे १२ वर्गखोल्यांची दुमजली इमारत होण्याचे काम होईल तेव्हा होईल; पण पूर्वी ज्या सहा वर्गखोल्या कुंभारआळी शाळेच्या आवारात होत्या, त्या तर बांधून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.कुंभारआळी शाळेची इमारत पाडली, तेव्हा नवीन किती वर्गखोल्या बांधण्यात येणार होत्या, याबद्दल काही माहिती नाही; पण आपण त्या जागेवर सहा वर्गखोल्या बांधण्याचे काम मंजूर करून घेतले आहे.- अनसूया पादिर, सदस्या,रायगड जिल्हा परिषदनेरळ कुंभारआळी शाळेचा विषय हा चौकशीच्या फेऱ्यात असून, जिल्हा परिषद स्वतंत्र चौकशी करीत आहे. त्यामुळे आपल्याला त्याबाबत काहीही अधिक सांगता येणार नाही.- सुरेखा हिरवे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई