शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ग्रामस्थांचा स्थलांतरास ठाम विरोध

By admin | Updated: May 23, 2016 03:09 IST

भूगर्भ शास्त्रज्ज्ञांच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३४ गावांना दरडी कोसळण्याचा धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे

महाड : भूगर्भ शास्त्रज्ज्ञांच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३४ गावांना दरडी कोसळण्याचा धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला असून ३४ गावातील दरडीचा धोका टाळण्यासाठी या दरडप्रवण गावातील दोन हजार ५० कुटुंबातील नऊ हजार ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत. मात्र या गावातील बहुतांश कुटुंबांनी स्थलांतर करण्यास ठाम विरोध दर्शवला आहे. आधी पुनर्वसन करा मगच त्या ठिकाणी आमचे स्थलांतर करु अशी भूमिका या दरडप्रवण गावातील ग्रामस्थांनी घेतल्याने महसूल विभागापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महसूल विभागाला आपली खरोखरच काळजी वाटते मग केवळ पावसाळ्यापूर्वीच हे स्थलांतराचे सोपस्कार का केले जातात, असा सवालही हे ग्रामस्थ व्यक्त करताना दिसून येत आहेत. मुळात महाड तालुक्यातील गावे डोंगरालगत आहे. २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जुई, कोंडीवते, दासगाव, रोहन या गावावर दरडी कोसळून शेकडो जणांचे बळी गेले तर असंख्य कुटुंबे बेघर झाली. या दरडग्रस्त बेघर कुटुंबांचे दासगाव वगळता सर्व ठिकाणचे पुनर्वसन प्राईड इंडिया, लालबागचा राजा ट्रस्ट, जनकल्याण ट्रस्ट या सेवाभावी संस्थांमार्फत करण्यातही आले. या पार्श्वभूमीवर यंदा नेहमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे महसूल विभागामार्फत उपाययोजना केली जात आहे. त्या दृष्टीने दरडीचा धोका टाळण्यासाठी दरडप्रवण ३४ गावातील ग्रामस्थांनी अन्यत्र स्थलांतर करावे जर ही कुटुंबे स्थलांतरित झाली नाहीत तर त्या कुटुंबाचे जबरदस्तीने स्थलांतर करण्याचा इशारा महसूल विभागातर्फे दिला आहे२००५ पासून आम्हाला स्थलांतर करण्याच्या सूचना शासन देते, मात्र गेली ११ वर्षे शासनाने याबाबत कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे हे ग्रामस्थ संतप्त होवून सांगत आहेत. (वार्ताहर)