शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
2
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
3
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
5
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
6
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
7
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
8
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
9
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
10
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
11
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
12
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
13
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
14
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
15
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
16
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
17
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
18
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
19
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!

कचऱ्यातून वीजनिर्मितीला तीव्र विरोध

By admin | Updated: March 4, 2016 02:00 IST

विरोधकांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या बळावर कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याच्या १८० कोटी रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली.

नवी मुंबई : विरोधकांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या बळावर कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याच्या १८० कोटी रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली. परंतु आघाडीमधील काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी यांनीही विरोध दर्शवून आंदोलनाचा इशारा देऊन विरोधी पक्षाची कमतरता भरून काढली. कचऱ्यातून मिथेन निर्मितीचा प्रकल्प फसल्यानंतर आता महापालिकेने कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा १८० कोटी रूपयांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी मांडला होता. शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी सभात्याग केला असल्यामुळे प्रस्ताव सहज मंजूर होईल असे वाटत असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीच प्रस्तावाला आक्षेप घेतल्याने हा प्रस्ताव पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पालिकेने डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती व फ्यूएल पॅलेट्स तयार करण्याचा ठेका खाजगी कंपनीला दिला आहे. परंतु खत व फ्युएलला मागणी नसल्याने संबंधितांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यांचा तोटा भरून काढण्यासाठी कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला. ६०० ते १२०० टन प्रतिदिन क्षमतेचा घनकचऱ्यापासून विद्युत निर्मिती केली जाणार असून ती महावितरणला विकली जाणार आहे. यासाठी १८० कोटी रूपये खर्च होणार आहेत. काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी तीव्र आक्षेप घेतले. मोरबे धरणावरील १७० कोटी रूपयांचा सौरऊर्जा प्रकल्प ठप्प झाला आहे. कचऱ्यातून वीजनिर्मिती करून ती ७.९० रूपये प्रतियुनिट दराने महावितरणला विकली जाणार आहे. परंतु महावितरणच्या स्वत:च्या वीजनिर्मितीचा दर ४.५९ व सौरउर्जेतून वीजनिर्मितीचा दर ७.४ रूपये असताना पालिकेची वीज ७ रूपये दराने कशी विकत घेतली जाणार? ठेकेदाराच्या हितासाठी पालिकेचे पैसे फुकट घालवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला तर तुर्भे स्टोअर परिसरातील २ लाख नागरिक आंदोलन करतील असा इशारा दिला. पालिका देशभरातून आलेल्या शिष्टमंडळाला डंपिंग ग्राऊंड दाखवून ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे सांगत आहे. येथील डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपत आली असताना तिथे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा डाव आहे. आम्ही हा डाव उधळून लावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीच विरोध दर्शविल्यामुळे वीजनिर्मितीचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (प्रतिनिधी)> कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्तावासाठी १८० कोटी रूपये खर्च होणार आहे. महापालिका पैसे नसल्याचे कारण सांगून ऐरोलीतील नाट्यगृहासह अनेक प्रकल्प धीम्या गतीने करत आहे. कोणताही मोठा प्रकल्प सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीचे वीजनिर्मितीचे सर्व प्रकल्प फसले असताना पुन्हा जनतेने कररुपाने दिलेल्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली आहे. डंपिंगमधील आगही संशयास्पद१डंपिंग ग्राऊंडला १ मार्चला आग लागली होती. दिवाळीनंतरची ही दुसरी घटना. वास्तविक डंपिंग ग्राऊंडमध्ये तेथील रोजच्या कर्मचाऱ्यांऐवजी दुसऱ्या कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. जिथे आग लागली तिथे बाहेरून कशामुळे आग लागणे शक्यच नाही. २दिवाळीमध्ये फटाक्यामुळे आग लागली असे सांगण्यात आले. पण आता काहीच कारण नसताना आग लागलीच कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आग लावली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आगीची चौकशी करण्याची मागणी होवू लागली आहे.