शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

पाणीपुरवठा यंत्रणेला बळकटी

By admin | Updated: December 21, 2015 01:33 IST

पनवेल शहरातील २०४५ सालच्या लोकसंख्येचा विचार करून शहर पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण १५३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलपनवेल शहरातील २०४५ सालच्या लोकसंख्येचा विचार करून शहर पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण १५३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची सरकारच्या तांत्रिक व्यवस्थापनाकडून छाननी होवून मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव अमृत योजनेंतर्गत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल असा आशावाद पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.देहरंग धरणाची क्षमता कमी असल्याने पालिका एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोकडून पाणी विकत घेऊन ते पनवेलकरांना पुरवते. प्रशासनाला दरमहा देहरंग धरणाचे पाणी सोडून ५० लाख रुपये खर्च येतो. मात्र पाणी बिलापोटी फक्त ४० लाख रुपयेच जमा होतात. याचा अर्थ दरमहा १० लाखांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागत असून सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्यासाठी वर्षाला अदा करावे लागतात. त्यांचा परिणाम विकासकामावर होत असून पाण्याने अनेकदा पालिकेला कर्जबाजारी केले आहे. पनवेल शहराला वर्षभर पाणीपुरवठा करण्याकरिता मुबलक पाण्याची उपलब्धता असण्याबाबत चर्चा झाल्या. त्यातून शहर पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्याचा मुद्दा पुढे आला. धरणाची उंची वाढविण्याकरिता सर्व्हे करण्यात आला. संबंधित कंपनीने अहवाल तयार करून पालिकेला सादर केला आहे. त्यानुसार उंची वाढविण्याचा प्रस्ताव आहेच. त्याचबरोबर चार महिने पावसाळयात ओव्हरफ्लो होणारे पाणी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.त्याचबरोबर ३८ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. धरणाच्या खालच्या बाजूला हे के ंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे आराखड्यात म्हटले आहे. आवश्यक तिथे वितरण व्यवस्था व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण सहा उंच जलकुंभ शहरात प्रस्तावित आहेत. शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा पंपिंग मशिनमुळे सक्षम होईल त्याचबरोबर नागरिकांना जास्त दाबाने पाणीपुरवठा करता येणार आहे. याकरिता एकूण ११० कोटींचे विस्तृत अंदाजपत्रक व आराखडे सरकारकडे सादर करण्यात आले आहेत.देहरंग धरणातील इनटेक वेल बांधणे जेणेकरून पाण्याचा साठा वाढेल, ३८ एमएलडी क्षमतेची जलशुध्दीकरण केंद्र विकसित करणे या गोष्टींचा समावेश आहेच. त्याचबरोबर साडेबारा एमएलडी क्षमतेची गाढेश्वर मंदिराजवळ बैठी टाकी बांधण्याचा प्रस्ताव आहे. ६00 मि.मी. व्यासाची १३ कि.मी. लांबीची गुरुत्व जलवाहिनी टाकणे, पाच आरसीसी उंच जलकुंभ उभारणे त्याची क्षमता प्रत्येकी १ एमएलडी असेल. शहरातील सर्व ग्राहकांना अद्ययावत मीटर बसविणे. शहरात आवश्यक तिथे जलवाहिन्या टाकण्याबरोबर पंपिंग मशिनरी बसविण्याचा प्रस्ताव आराखड्यात आहे.योजनेमुळे पनवेल शहराचा पाणीप्रश्न निकाली निघेल याबाबत शंका बाळगण्याचे काही एक कारण नाही. त्या दृष्टीने आमचा पाठपुरावा सुरू आहे. धरणाची उंची वाढविण्याकरिता ७० कोटी खर्च अपेक्षित असून एकूण १५३ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केले आहे. जसा निधी प्राप्त होईल त्याप्रमाणे कामांना सुरुवात करण्यात येईल.- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका.