शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

शाळा व्यवस्थापनाकडून होणारी लूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 01:07 IST

पालकांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे : शुल्क आकारणी अधिनियमात सुधारणा करा

नवी मुंबई : कोराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद झाले असून आर्थिक स्थिती बिकट आहे. यानंतरही शाळा व्यवस्थापनाकडून फीसाठी सक्ती केली जात आहे. संस्थाचालकांकडून होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क व विनियमन) २०११ मध्ये सुधारणा करण्याची मागणी पालकांनी केली. 

शैक्षणिक संस्थांकडून लुबाडणूक होऊ नये यासाठी शासनाने ८ मे रोजी आदेश काढून पालकांना दिलासा दिला होता. परंतु खासगी शाळांच्या युनियनने आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून न्यायालयाने शासन आदेशास अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे शाळांकडून पालकांना फी भरण्याची सक्ती केली जाऊ लागली आहे. फी न देणाऱ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. शिक्षण संस्थांच्या नफेखोरीला लगाम लावण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क व विनियमन) २०११ मंजूर केला आहे. परंतु कोरोना काळात या अधिनियमानुसार पालकांना दिलासा मिळत नसल्याने त्यामध्ये काही सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ‘पॅरेंट्स ऑफ महाराष्ट्र’ या समूहाच्या नावाने अनेक दक्ष पालक एकत्र जमले असून त्यांनी सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भूषण रामटेेके, देवेंद्र देशमुख, सखाराम गारगे, तुषार दळवी, मुराद जीवणी, युक्ती शाह, सकीना वोरा, रेवती कुमार व इतर उपस्थित होते.

प्रमुख मागण्याशासनाने कोरोना काळात शिक्षण संस्थांची फी भरण्यासाठी काय उपाययोजना करावी, शिक्षकांचा पगार व इतर अत्यावश्यक गोष्टींसाठी आवश्यक तेवढेच शुल्क फी म्हणून वापरावे. शासनाने २०११ च्या अधिनियमामध्ये पाच प्रमुख बदल करावेत अशा सूचना शिष्टमंडळाने केल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे समजून घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई